शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

“अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 08:02 IST

Maharashtra Udyog Ratna To Ratan Tata: ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे.

Maharashtra Udyog Ratna To Ratan Tata: महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. रतन टाटा म्हणतात की, व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय. ही बांधीलकी टाटा आजही जपत आहेत. त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचे काय? त्यांचे हात चोऱ्या–लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली. अशा लोकांकडून श्री. रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातून विश्वास संपला आहे. राजकारण हे खोटेपणाच्या व अविश्वासाच्या पायावर उभे आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच रोज खोटे बोलत आहेत. अशा खोटेपणाच्या वातावरणात महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला व देवेंद्र फडणवीस, अजित पवार वगैरे लोक त्या सोहळय़ास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास. प्रश्न असा आहे की, अशा विश्वासपात्र व्यक्तीला पुरस्कार देणाऱ्यांनी ‘विश्वास’ शब्दाची हत्याच केली, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. 

टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय?

मग ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय? टाटा यांचे राष्ट्र उभारणीत योगदान मोठे आहे. मिठापासून विमानांपर्यंतच्या उद्योगांत टाटा आहेत. टाटांनी महाराष्ट्रास कर्मभूमी मानले व उद्योगाचा विस्तार देशात केला, असे म्हणताना, टाटांच्या निष्ठा कधी बदलल्या नाहीत. मात्र देशाच्या राजकारणाची सध्या काय अवस्था आहे? आज राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे. टाटांच्या उद्योगांवर कधी धाडी पडल्या नाहीत, पण टाटांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या महानुभावांच्या उद्योगांवर धाडी पडत असल्याने विश्वासाची ऐशी की तैशी करून या सगळ्यांनी पक्षांतर केले व टाटांना पुरस्कार देण्यासाठी पुढे आले, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीत टाटांचे योगदान मोलाचे आहे व कोणी दबाव आणला म्हणून टाटांनी त्यांचे उद्योग गुंडाळून गुजरातेत हलवले नाहीत. ‘उद्योगरत्न’ म्हणून टाटांचा गौरव करताना महाराष्ट्राच्या घसरत चाललेल्या औद्योगिक क्षेत्राची चिंता शिंदे-पवार-फडणवीस सरकारला आहे काय? महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमजोर, खिळखिळा करण्याचा उद्योग केंद्राने चालवला आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, आर्थिक उलाढालींची केंद्रे गुजरातेत खेचून नेली जात आहेत. महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण व सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे व त्या लुटीस हातभार लावणाऱ्यांच्या हातून टाटांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. टाटा म्हणजे विश्वास हे सांगणाऱ्यांनी जनमानसातून विश्वास गमावला आहे. पवार, शिंदे, फडणवीस हे लोकांच्या विश्वासास पात्र राहिलेले नेतृत्व नाही. अविश्वासाचे जुगाड करून सत्तेवर आलेले हे त्रिकुट आहे. रतन टाटा हे जगाच्या खोट्या दिखाव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. ते साधे राहतात. उच्च विचारांचे ते शालीन व्यक्तिमत्त्व आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatan Tataरतन टाटाState Governmentराज्य सरकार