शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

“JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 08:51 IST

Shiv Sena Thackeray Group Vs Central Govt: गाझापट्टीप्रमाणे जम्मू काश्मीरमधील जनता जणू बंदिस्त आहे. कश्मीर समस्येवर तोडगा नाही आणि मणिपूरही अद्यापी पेटलेलेच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

Shiv Sena Thackeray Group Vs Central Govt: देश धोक्यात आहे. राष्ट्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे हे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस, लष्करी अधिकारी, जवानांचे बळी गेले. त्याचा आकडा धक्कादायक आहे, पण सरकारला त्याची ना खंत ना खेद. काँगेसमुक्त भारत, शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा आहे, पण दहशतवादमुक्त कश्मीर आणि मणिपूर करायचे नाही. पाकव्याप्त कश्मीर घेण्याची भाषा ते करतात, पण आहे त्या कश्मीरमध्ये जवानांचे हौतात्म्य थांबवता येत नाही. राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन व दोन जवान पुन्हा बलिदानाच्या वेदीवर चढले. कश्मीरमध्ये पुनः पुन्हा जवानांचे रक्त सांडत आहे, पण दिल्लीला चढलेली सत्तेची व निवडणुकांची नशा उतरत नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे मोदी-शाहांसाठी युद्धभूमीच झाली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ पाच राज्यांच्या युद्धभूमीवर उतरले आहे. पाच राज्यांत राजकीय युद्ध सुरू आहे व त्यात भाजपने काँगेससह त्यांच्या राजकीय दुश्मनांना गाडण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी सरकारने काँग्रेस तसेच गांधी कुटुंबाच्या मालकीच्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या मालमत्तेवर टाच आणली. ही मालमत्ता साधारण सहाशे कोटी रुपयांची आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली व स्वातंत्र्य लढय़ाचे हत्यार म्हणून ‘हेराल्ड’ने काम केले, पण स्वातंत्र्य लढ्याशी कोणताही संबंध नसलेल्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’वर जप्ती आणली व विजयी विकृत हास्य केले. मात्र त्याच वेळी कश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करणाऱ्यांचे, त्यांना पैसा देणाऱयांचे पंबरडे मोडण्यात मोदी-शाहांचे सरकार अपयशी ठरले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला.

मोदी-शाहांना कश्मीर प्रश्नाचे फक्त राजकारण करायचे

मोदी-शाहांना कश्मीर प्रश्नाचे फक्त राजकारण करायचे आहे. ३७० कलम हटविण्याचा खेळ असेल नाहीतर ‘पुलवामा’हत्याकांड, या घटनांचा वापर फक्त मते मागण्यासाठी झाला. साडेचार वर्षे झाली तरी जम्मू-कश्मीरात विधानसभा निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. निवडणुका घ्यायला केंद्र सरकार घाबरते आहे. जम्मू-कश्मीरातील इंटरनेट सेवा आजही बंद आहे व गाझापट्टीप्रमाणे तेथील जनता जणू बंदिस्त आहे. लोकशाही व स्वातंत्र्याची तेथे गळचेपी सुरू आहे. त्यात विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांचा आक्रोश भाजपचे मन अस्वस्थ करीत नाही. कश्मिरी पंडितांच्या घर वापसीचे वचन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत देणारे मोदी-शाह त्यानंतर तेथे फिरकलेच नाहीत. कश्मीर समस्येवर तोडगा नाही आणि मणिपूरही अद्यापि पेटलेलेच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

दरम्यान, मोदी-शाहा मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडची राजकीय लढाई जिंकायला उतरले आहेत. मोदी-शहा मणिपूर समस्येवर बोलायला तयार नाहीत, कश्मीर समस्येवर बोलत नाहीत. ते फक्त काँग्रेस व गांधी परिवारावर बोलतात. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय वैऱ्यांचा काटा काढता येईल, पण मणिपूर, कश्मीरमधील दहशतवाद व लष्करी जवानांचे हौतात्म्य थांबवता येणार नाही. कश्मीरात जवानांच्या हत्या थांबत नाहीत. कारण ही लढाई हत्यारांची आहे, या शब्दांत ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा