शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

“...तर मर्सिडीजसाठी मातोश्री पुरले नसते, मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले”: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:58 IST

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले.

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News:उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दिल्लीत साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना केलेल्या विधानावरून ठाकरे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून टीका केली आहे. चार टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यांनी असा आरोप करणे दुर्दैवी आहे. असा आरोप करणे ही नमक हरामी आहे, असा पलटवार दानवे यांनी केला. 

मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, उदाहरण देतो की, मी ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. छत्रपती संभाजीनगरसारख्या मराठवाड्यातील काम करणारा राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. मला पक्षाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामांसाठी निधी दिला आहे. परंतु, माझ्याकडून कधी पक्षाने एक रुपया कधी मागितला नाही किंवा कधी मला द्यावा लागला नाही, आता नीलम ताई बोलत आहेत. त्या ज्येष्ठ आहेत. त्यांनी अशा प्रकारे आरोप करणे दुर्दैवी आहे. मातोश्रीवरून मुख्यमंत्रीपदापासून अनेक पदापर्यंत अनेक पदे पक्षाने दिली, तर मग मातोश्रीवर मर्सिडीजची रांग लागली असती, कार उभ्या करायला जागा राहिली नसती, असे दानवे म्हणाले.

दरम्यान, साहित्य संमेलनामध्ये अशा विषयांचा संबंध काय आहे? राजकारण करायला साहित्य संमेलनामध्ये जाता का? साहित्य संमेलन राजकीय कारणासाठी वापरले जातात का? आरोप करणे आता फॅशन झालेली आहे. महाराष्ट्राचा अपमान नीलमताई करत आहेत. ठाण्याच्या बळावर शिवसैनिक कमवत होते असे आहे का? नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं आहे, मी काहीतरी करते आहे, दुसऱ्यांना नाव ठेवायची आणि स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवायची. याउलट नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान दानवे यांनी दिले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हेAmbadas Danweyअंबादास दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे