शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

“...तर मर्सिडीजसाठी मातोश्री पुरले नसते, मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले”: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:58 IST

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले.

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News:उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दिल्लीत साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना केलेल्या विधानावरून ठाकरे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून टीका केली आहे. चार टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यांनी असा आरोप करणे दुर्दैवी आहे. असा आरोप करणे ही नमक हरामी आहे, असा पलटवार दानवे यांनी केला. 

मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, उदाहरण देतो की, मी ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. छत्रपती संभाजीनगरसारख्या मराठवाड्यातील काम करणारा राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. मला पक्षाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामांसाठी निधी दिला आहे. परंतु, माझ्याकडून कधी पक्षाने एक रुपया कधी मागितला नाही किंवा कधी मला द्यावा लागला नाही, आता नीलम ताई बोलत आहेत. त्या ज्येष्ठ आहेत. त्यांनी अशा प्रकारे आरोप करणे दुर्दैवी आहे. मातोश्रीवरून मुख्यमंत्रीपदापासून अनेक पदापर्यंत अनेक पदे पक्षाने दिली, तर मग मातोश्रीवर मर्सिडीजची रांग लागली असती, कार उभ्या करायला जागा राहिली नसती, असे दानवे म्हणाले.

दरम्यान, साहित्य संमेलनामध्ये अशा विषयांचा संबंध काय आहे? राजकारण करायला साहित्य संमेलनामध्ये जाता का? साहित्य संमेलन राजकीय कारणासाठी वापरले जातात का? आरोप करणे आता फॅशन झालेली आहे. महाराष्ट्राचा अपमान नीलमताई करत आहेत. ठाण्याच्या बळावर शिवसैनिक कमवत होते असे आहे का? नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं आहे, मी काहीतरी करते आहे, दुसऱ्यांना नाव ठेवायची आणि स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवायची. याउलट नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान दानवे यांनी दिले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हेAmbadas Danweyअंबादास दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे