शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 20:54 IST

शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं.

औरंगाबाद - शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज असल्याचं समोर आलं. त्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना पाचारण करण्यात आलं. एका हॉटेलमध्ये खोतकर आणि सत्तार यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली. सकाळपासून हॉटेलमध्ये असणारे अब्दुल सत्तार तब्बल ९ तासानंतर हॉटेलच्या बाहेर पडले. 

त्यावेळी माध्यमाशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी राजीनामा दिला असं कोणी सांगितलं नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत. मी आज कोणालाही काहीही उत्तर देणार नाही, वेळ येईल तेव्हा सर्व प्रश्नाची उत्तरं देईन, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, उद्धवजींशी चर्चा करुन बोलेन अशी भूमिका सत्तारांनी मांडली. 

तर 'माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर' आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलल्यानंतर मी भाष्य करेन, उद्या दुपारी आमची भेट होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या राजीनाम्याच्या बातम्या बंद करा असंही अब्दुल सत्तारांनी माध्यमांना सांगितलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरुन औरंगाबाद शिवसेनेत दुफळी माजल्याचं दिसून आलं. त्याचाच परिणाम म्हणून अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीची २ मते फुटल्याने त्याचा फायदा भाजपाच्या एलजी गायकवाड यांना झाला. 

दरम्यान, शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. सत्तार हे गद्दार आहे. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असं त्यांनी पक्षनेतृत्वाकडे विनंती केली. तसेच अब्दुल सत्तार यांना भाजपाला मदत करायची होती तर शिवसेनेत कशाला आला? हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उभं राहून दाखवा असं आव्हानही खैरेंनी अब्दुल सत्तारांना दिलं. सत्तारांच्या राजीनाम्यानंतर विरोधी भाजपानेही ठाकरे सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. 

महत्त्वाच्या बातम्या

अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका

सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे