शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:31 IST

Uday Samant News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Uday Samant News: अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरून अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी जयंत पाटील यांच्या पराभवावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, जयंत पाटील यांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने आहे. कोणी कोणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील यांना मत फुटणार असे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले, असा आरोप उदय सामंत यांनी केला. 

महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार परत येईल

आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सातत्याने महायुती सरकार कोसळेल, पुढील विधानसभेला पुन्हा महायुतीचे सरकार येणार नाही, असे दावे करताना दिसत आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, अडीच वर्षापासून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणत होते. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा येईल. सरकारला काही होणार नाही, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, ठाकरे गट हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर आघाडी आणि युती करावी, तसेच २८८ जागा लढवाव्या की, फक्त ८८ जागा लढवाव्यात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. २८८ मतदारसंघाचा ते आढावा घेणार असतील तर कदाचित स्वबळावर निवडणूक लढण्याचे त्यांच्या मनात असेल. त्यामुळे ते अशी चाचपणी करत असतील. मग चाचपणी केल्यानंतर २८८ उमेदवार त्यांच्याकडे आहेत की नाही हे त्यांना समजेल, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती