शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“...तर ओमर अब्दुल्लांना जाब विचारायची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये कुठून येईल”; शिंदे गटाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:43 IST

Shiv Sena Shinde Group Shrikant Shinde News: काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Shiv Sena Shinde Group Shrikant Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता ओमर अब्दुल्ला यांच्या एका विधानावरून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात येईल, असे महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केले होते. याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर ओमर अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला. काश्मीरमध्ये आपण सत्तेवर आलो, तर महाराष्ट्र सदनाचे बांधकाम थांबवण्यात येईल. महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असा पवित्रा ओमर अब्दुल्ला यांनी घेतला. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत ठेवा

ओमर अब्दुल्लांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. ज्या लोकांनी इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले, अशा लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की, ओमर अब्दुल्ला जेव्हा म्हणाले होते की, महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये कसे होते तेच बघतो, तेव्हा त्यांना एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचे काम केले. तेथेच राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात. इंडिया आघाडीतील नेत्यांचे स्वागत केले. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांना जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल, या शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द काढलेला नाही 

अडीच वर्षं तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली.२०२४ ला आपण एकटे न पडता सत्तेत कसे येऊ या दृष्टीने तुम्ही लाचारी पत्करली आहे. महाराष्ट्रद्वेष ज्यांच्या अंगात भरलेला आहे, अशा ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द त्यांनी काढलेला नाही. त्यांना ती हिंमतही होणार नाही, या शब्दांत निशाणा साधताना, काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्राचे जातात. सर्वाधिक पर्यटन उत्पन्न काश्मीरला महाराष्ट्रातून मिळते. काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेOmar Abdullahउमर अब्दुल्ला