शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

“उद्धव ठाकरेंना युती नकोच होती, शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:57 IST

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचेच नव्हते. एकनाथ शिंदे हवे तर तुम्ही बोला, पण मी जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनीच तेव्हा सांगितले, असा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. एका सभेत बोलताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शब्द दिला होता. पण आता खोटे बोलत आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. यावर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्याने पलटवार केला आहे.

तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटे बोलत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी ज्या सभेत अमित शाह खोटे बोलतात असे म्हणाले. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजपा आणि नंतरची शिवसेना असे होते. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपाने हे मान्य केले कीस आधीची अडीच वर्षे देतो. हे खोटे आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले.

शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

भाजपासोबत जायचे नाहीच. हवे तर एकनाथ शिंदे तुम्ही बोला पण, मी जाणार नाही. हे यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. प्रश्न नीतिमत्तेच्या असेल तर त्यांनी शपथपूर्वक सांगावे, असे शिरसाट म्हणाले. तसेच जागावाटपावर बोलताना ते म्हणाले की, जागावाटपाबाबतच्या तुमच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत, असे शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिले आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्या निकालावर टीका करण्याचा जो प्रयत्न केला, हे समजून घेतले पाहिजे की, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले नाहीत किंवा स्टे आणला नाही. नार्वेकरांनी दरवेळेला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, राऊतांना जाणीव होती की आपण चुकीची घटना सादर केली आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा