शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“२५ वर्ष BMC उद्धव ठाकरेंकडेच, मराठी माणूस बाहेर जायला तेच जबाबदार”: रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:22 IST

Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवाल करत रामदास कदम यांनी मोठी मागणी केली आहे.

Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: गेली २५ वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. या काळात मुंबईतील ६० टक्के मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. याला जबाबदार उद्धव ठाकरे नाहीत का, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, या घोषवाक्याने पक्षकार्याला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकले, हे वास्तव आहे. या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

पत्रकारांशी बोलताना रामदास कदम पुढे म्हणाले की, मराठी माणसाचे नाव घेण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत पत्रकार परिषद घेतली. आता मला सांगा की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना काळिमा फासला, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकात पाय ठेवण्याचा तरी अधिकार आहे का, अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. 

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात?

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेबांना अतिशय दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे, अशी मोठी मागणी रामदास कदम यांनी केली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे देवाभाऊ.. देवाभाऊ.. करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे मोठा फुलांचा गुच्छ घेऊन भेटत आहेत. कालपर्यंत तुम्ही एकतर तू राहशील किंवा मी राहीन, देवाभाऊ सगळे खाऊ, अशी भाषा करत होतात. आता अचानक असे काय झाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या पायावर डोके ठेवायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. शिवसेनाप्रमुखांचे तुम्ही पुत्र आहात, याचे भान ठेवा. स्वाभिमान ठेवा. किती लाचारी पत्करणार आहात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची पापाची पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे, या शब्दांत रामदास कदम यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना