शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

“२५ वर्ष BMC उद्धव ठाकरेंकडेच, मराठी माणूस बाहेर जायला तेच जबाबदार”: रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:22 IST

Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवाल करत रामदास कदम यांनी मोठी मागणी केली आहे.

Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: गेली २५ वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. या काळात मुंबईतील ६० टक्के मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. याला जबाबदार उद्धव ठाकरे नाहीत का, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, या घोषवाक्याने पक्षकार्याला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकले, हे वास्तव आहे. या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

पत्रकारांशी बोलताना रामदास कदम पुढे म्हणाले की, मराठी माणसाचे नाव घेण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत पत्रकार परिषद घेतली. आता मला सांगा की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना काळिमा फासला, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकात पाय ठेवण्याचा तरी अधिकार आहे का, अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. 

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात?

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेबांना अतिशय दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे, अशी मोठी मागणी रामदास कदम यांनी केली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे देवाभाऊ.. देवाभाऊ.. करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे मोठा फुलांचा गुच्छ घेऊन भेटत आहेत. कालपर्यंत तुम्ही एकतर तू राहशील किंवा मी राहीन, देवाभाऊ सगळे खाऊ, अशी भाषा करत होतात. आता अचानक असे काय झाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या पायावर डोके ठेवायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. शिवसेनाप्रमुखांचे तुम्ही पुत्र आहात, याचे भान ठेवा. स्वाभिमान ठेवा. किती लाचारी पत्करणार आहात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची पापाची पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे, या शब्दांत रामदास कदम यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना