शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 18:10 IST

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे सोबत येणार असतील, तर त्यांचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असावा, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील, तर निश्चित मराठी माणसाचे हित त्यात आहे. ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते कालही होते आणि आजही आहे. मी आणि बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकत्र येण्यासाठी हात पुढे केले. परंतु, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्याला मान्यता दिली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिली. 

राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच रामदास कदम यांनी यावर भाष्य केले आहे. 

राज ठाकरेंचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला तेव्हा सांगितले होते. केवळ पुणे आणि नाशिक जिल्हा मला द्यावा आणि बाकी उद्धव ठाकरेंनी सांभाळावे, एवढीच मागणी राज ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातातून सगळेच गेले आहे. आकाश फाटले आहे. त्यामुळे ठिगळे कुठे-कुठे लावणार. मग राज ठाकरे येत असतील, तर त्यांचा आधार घेऊन आपल्याला राजकारणात थोडे डोके वर काढता येऊ शकेल का, हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असावा, असा दावा रामदास कदम यांनी केला. 

तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेना फुटली नसती

मी दोघांचे काम पाहिले आहे. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत. आतल्या गाठीचे नाहीत. परंतु, उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. आता अटी आणि शर्थी घालायला प्रश्न कुठे येतो, तुम्ही भाऊ आहात ना. त्यावेळेस आमच्याकडून चूक झाली. महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला हवे होते. शिवसेनेकडून ही झालेली मोठी चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते, तर शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे यांच्याकडे माणसे ओळखण्याची किमया आहे. राज ठाकरे वाघासारखा माणूस आहे. त्यांना वाघासारखी माणसे लागतात. उद्धव ठाकरेंना सुभाष देसाई यांच्यासारखी माणसे लागतात. शेळ्या मेंढ्या. दोन्ही भाऊ एकत्र आले, तर चांगले आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, तर राज ठाकरे येतील असे वाटत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना राज ठाकरे काळिमा फासणार नाही. राज ठाकरे स्वाभिमानी माणूस आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर महाराष्ट्र आज राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना पाहात आहे. हे वास्तव आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. राज ठाकरे यांना टाळी देणार असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडणार का, हे उद्धव ठाकरेंना तुम्ही विचारा. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे