शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 18:10 IST

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे सोबत येणार असतील, तर त्यांचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असावा, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील, तर निश्चित मराठी माणसाचे हित त्यात आहे. ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते कालही होते आणि आजही आहे. मी आणि बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकत्र येण्यासाठी हात पुढे केले. परंतु, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्याला मान्यता दिली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिली. 

राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच रामदास कदम यांनी यावर भाष्य केले आहे. 

राज ठाकरेंचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला तेव्हा सांगितले होते. केवळ पुणे आणि नाशिक जिल्हा मला द्यावा आणि बाकी उद्धव ठाकरेंनी सांभाळावे, एवढीच मागणी राज ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातातून सगळेच गेले आहे. आकाश फाटले आहे. त्यामुळे ठिगळे कुठे-कुठे लावणार. मग राज ठाकरे येत असतील, तर त्यांचा आधार घेऊन आपल्याला राजकारणात थोडे डोके वर काढता येऊ शकेल का, हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असावा, असा दावा रामदास कदम यांनी केला. 

तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेना फुटली नसती

मी दोघांचे काम पाहिले आहे. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत. आतल्या गाठीचे नाहीत. परंतु, उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. आता अटी आणि शर्थी घालायला प्रश्न कुठे येतो, तुम्ही भाऊ आहात ना. त्यावेळेस आमच्याकडून चूक झाली. महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला हवे होते. शिवसेनेकडून ही झालेली मोठी चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते, तर शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे यांच्याकडे माणसे ओळखण्याची किमया आहे. राज ठाकरे वाघासारखा माणूस आहे. त्यांना वाघासारखी माणसे लागतात. उद्धव ठाकरेंना सुभाष देसाई यांच्यासारखी माणसे लागतात. शेळ्या मेंढ्या. दोन्ही भाऊ एकत्र आले, तर चांगले आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, तर राज ठाकरे येतील असे वाटत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना राज ठाकरे काळिमा फासणार नाही. राज ठाकरे स्वाभिमानी माणूस आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर महाराष्ट्र आज राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना पाहात आहे. हे वास्तव आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. राज ठाकरे यांना टाळी देणार असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडणार का, हे उद्धव ठाकरेंना तुम्ही विचारा. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे