शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

“आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार”; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:46 IST

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत केल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. काही झाले तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

वरळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत मनसे काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीची चाचपणी सुरू झाली असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. वरळीतून निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितले होते की, सर्वजण ही सीट पाहायला येतील. वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात. सर्वांचे स्वागत करतो. काही मोठ्या लोकांनी या ठिकाणी रोड शो करावा, अशी माझी विनंती आहे. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आता आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणुकीला उभे राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात, हे पाहावे लागेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, वरळीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षा होती की, ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. परंतु, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त ६ हजार मताधिक्य मिळाले. त्यांना वाटत होते की, मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे. हे लोकांनी दाखवून दिले. या ठिकाणी १९ टक्के मतदान शिवसेनेला पडायचे त्यापैकी १४ टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झाले, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळीShiv Senaशिवसेना