शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

“आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार”; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:46 IST

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत केल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. काही झाले तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

वरळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत मनसे काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीची चाचपणी सुरू झाली असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. वरळीतून निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितले होते की, सर्वजण ही सीट पाहायला येतील. वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात. सर्वांचे स्वागत करतो. काही मोठ्या लोकांनी या ठिकाणी रोड शो करावा, अशी माझी विनंती आहे. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आता आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणुकीला उभे राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात, हे पाहावे लागेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, वरळीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षा होती की, ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. परंतु, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त ६ हजार मताधिक्य मिळाले. त्यांना वाटत होते की, मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे. हे लोकांनी दाखवून दिले. या ठिकाणी १९ टक्के मतदान शिवसेनेला पडायचे त्यापैकी १४ टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झाले, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळीShiv Senaशिवसेना