शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर? ठाकरे गटाची पुन्हा कोर्टात जायची तयारी; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 17:49 IST

Maharashtra Political Crisis: १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेविधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली असून, २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसीला अद्याप तरी विधानसभा अध्यक्ष किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर सादर करण्यात आलेले नाही, असे समजते. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी वेळ मागितल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांभणीववर पडण्याची शक्यता आहे. यावर ठाकरे गटातील आमदार अनिल परब यांनी भाष्य केले आहे. 

आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, लवकरच निर्णय येईल

सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तो निर्णय देताना काही गाईडलाईन दिल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे १६ आमदारांना अपात्र घोषित करावी लागेल. ही वेळकाढूपणा भूमिका आहे. म्हणून पुन्हा मुदत वाढ मागितली आहे. आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ. लवकरच निर्णय येईल, असे अनिल परब म्हणालेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तीन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. तसेच दोन आठवड्यांत विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात येत आहे, असे निर्देश सरन्यायाधीश डीवाय. चंद्रचूड यांनी दिले.

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय