शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 18:39 IST

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या जागा वाढल्या असत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी झाले ते चांगले झाले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. तसेच अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशावरूनही राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. विधानसभेला १०० जागा दिल्या नाहीत तर सर्व जागांवर आम्ही निवडणुका लढवू, असे रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. 

अजित पवार थोडे उशीरा आले असते, मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर ती ९ मंत्रि‍पदे आम्हाला मिळाली असती. आमच्या पक्षाला मिळाली असती. एकनाथ शिंदे यांनी काही जणांना शब्द दिले होता. महाडचे भरतशेठ गोगावले कधीपासून सफारी शिवून तयार आहेत. ते वाट बघत आहेत. २-४ जणांना शब्द दिला होता आणि तो पाळता येत नाही. त्यामुळे अजितदादा उशीरा आले असते तर त्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती. अजितदादांबाबत प्रचंड आदर आहे. ते धाडसी व्यक्ती, प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत. पण अजितदादा आणखी लेट आले असते तर आमच्या शिवसेनेचा फायदा झाला, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. रामदास कदम यांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलो आहोत

 आम्हाला १०० जागा द्या, ही विनंतीवजा मागणी आहे. आम्ही ज्या विश्वासाने तुमच्यासोबत आलो, त्यामुळे जेवढ्या जागा तुम्ही घ्या तितक्या आम्हाला द्या अशी मागणी भाजपाकडे आहे. एकनाथ शिंदे यांना १५ जागा लोकसभेच्या मिळाल्या, शिवसेना म्हणून १८ खासदार होते. तेवढ्या जागा मिळायला हव्या होत्या. जागावाटपावेळी जे झाले ते चांगले झाले नाही. रायगड आमचे, रत्नागिरी आमचे, अमरावती आमचीच असे सगळे भाजपाने केले. एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला १०० जागा द्या. अन्यथा सर्वच जागा आमच्या असतील, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचे विश्लेषण तीनही पक्षांनी करावे. भाजपाला सर्व्हेचे प्रकरण पटले नसावे. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. भावना गवळी, हेमंत गोडसे नको असे भाजपचे मत होते. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahayutiमहायुती