शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 18:39 IST

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या जागा वाढल्या असत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी झाले ते चांगले झाले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. तसेच अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशावरूनही राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. विधानसभेला १०० जागा दिल्या नाहीत तर सर्व जागांवर आम्ही निवडणुका लढवू, असे रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. 

अजित पवार थोडे उशीरा आले असते, मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर ती ९ मंत्रि‍पदे आम्हाला मिळाली असती. आमच्या पक्षाला मिळाली असती. एकनाथ शिंदे यांनी काही जणांना शब्द दिले होता. महाडचे भरतशेठ गोगावले कधीपासून सफारी शिवून तयार आहेत. ते वाट बघत आहेत. २-४ जणांना शब्द दिला होता आणि तो पाळता येत नाही. त्यामुळे अजितदादा उशीरा आले असते तर त्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती. अजितदादांबाबत प्रचंड आदर आहे. ते धाडसी व्यक्ती, प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत. पण अजितदादा आणखी लेट आले असते तर आमच्या शिवसेनेचा फायदा झाला, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. रामदास कदम यांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलो आहोत

 आम्हाला १०० जागा द्या, ही विनंतीवजा मागणी आहे. आम्ही ज्या विश्वासाने तुमच्यासोबत आलो, त्यामुळे जेवढ्या जागा तुम्ही घ्या तितक्या आम्हाला द्या अशी मागणी भाजपाकडे आहे. एकनाथ शिंदे यांना १५ जागा लोकसभेच्या मिळाल्या, शिवसेना म्हणून १८ खासदार होते. तेवढ्या जागा मिळायला हव्या होत्या. जागावाटपावेळी जे झाले ते चांगले झाले नाही. रायगड आमचे, रत्नागिरी आमचे, अमरावती आमचीच असे सगळे भाजपाने केले. एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला १०० जागा द्या. अन्यथा सर्वच जागा आमच्या असतील, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचे विश्लेषण तीनही पक्षांनी करावे. भाजपाला सर्व्हेचे प्रकरण पटले नसावे. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. भावना गवळी, हेमंत गोडसे नको असे भाजपचे मत होते. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahayutiमहायुती