शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 13:31 IST

west bengal assembly election 2021: संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा ममता दीदींना पाठिंबाममता बॅनर्जींवरील कारवाईमागे भाजप असल्याचा दावाफक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमांचे पालन केले नाही का - राऊत

मुंबई: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. यातच निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला आहे. ममता दीदींवर झालेल्या कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. (sanjay raut criticised bjp over eci imposed ban on mamata banerjee)

संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

निवडणूक आयोगाचा वेगवेगळा न्याय

यासंदर्भात पत्रकारांशीही बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा यासाठी भाजप जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षाकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. फक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमभंग केला आहे का, अशी विचारणा करत निवडणूक आयोग वेगळा न्याय लावत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये महाभारत

पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारे महाभारत सुरू आहे. महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाहीत. अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळले किंवा लढले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी नियमभंग केला असेल, तर कोणीही कायदा आणि आचारसंहितेच्या वर नाही. पश्चिम बंगाल निवडणुकीतील शिखंडी कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. 

EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली असून, १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी असेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी धरणे आंदोलन सुरू केले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एक ट्विट करत या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला असून, १२ एप्रिल... लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Sanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण