शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 12:10 IST

Rajya Sabha Election 2022: भाजपचे चारित्र्य उघड होत असून, कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशीही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून, याचा नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले असून, राज्यसभेच्या सर्व ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असून, भाजपने आपला पैसा फुकट घालवू नये. तो सत्कार्यात लावावा, असा खोचक टोला लगावला आहे. 

भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार दिल्यापासून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी भाजपला घोडेबाजार करायचा आहे, असा आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र, भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीला घोडेबाजाराची भीती वाटत असेल, तर त्यांनी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रतिआव्हान भाजपने दिले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीच माघार न घेतल्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 

अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीने सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणे आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणे उकरुन काढत त्रास दिला जात आहे. यात भाजपचे चारित्र्य उघड होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावे. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला. 

कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेत जातील. आम्ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचे वातावरण खराब करायचे आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे १० तारखेलाच कळेल, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेत लहान पक्षांचे १६, तर अपक्ष १३ आमदार आहेत. ते कोणासोबत जातील यावर निकाल अवलंबून असेल. बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, मनसे १, रासप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, जनसुराज्य पार्टी १, शेतकरी कामगार पक्ष १ आणि कम्युनिस्ट पक्ष १ असे लहान पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत:चे दोन, तर शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे, पण तिसऱ्या व दुसऱ्या जागेसाठी  इतरांची मदत लागेल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा