शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 12:10 IST

Rajya Sabha Election 2022: भाजपचे चारित्र्य उघड होत असून, कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशीही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून, याचा नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले असून, राज्यसभेच्या सर्व ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असून, भाजपने आपला पैसा फुकट घालवू नये. तो सत्कार्यात लावावा, असा खोचक टोला लगावला आहे. 

भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार दिल्यापासून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी भाजपला घोडेबाजार करायचा आहे, असा आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र, भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीला घोडेबाजाराची भीती वाटत असेल, तर त्यांनी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रतिआव्हान भाजपने दिले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीच माघार न घेतल्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 

अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीने सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणे आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणे उकरुन काढत त्रास दिला जात आहे. यात भाजपचे चारित्र्य उघड होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावे. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला. 

कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेत जातील. आम्ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचे वातावरण खराब करायचे आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे १० तारखेलाच कळेल, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेत लहान पक्षांचे १६, तर अपक्ष १३ आमदार आहेत. ते कोणासोबत जातील यावर निकाल अवलंबून असेल. बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, मनसे १, रासप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, जनसुराज्य पार्टी १, शेतकरी कामगार पक्ष १ आणि कम्युनिस्ट पक्ष १ असे लहान पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत:चे दोन, तर शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे, पण तिसऱ्या व दुसऱ्या जागेसाठी  इतरांची मदत लागेल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा