शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:51 IST

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले.

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यांच्यासह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असलेले आमदारही कामाला लागले आहेत. यातच आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी झाले आहेत, पुढे जाऊन देशाचे नेतृत्व करतील, याच भीतीने फोडाफोडीचे षड्यंत्र केले जात असल्याचा मोठा आरोप शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिंकले होते. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करत होते. ते जर असेच यशस्वी झाले तर उद्या देशाचे नेतृत्व करतील, ही काहींच्या मनात भीती असल्याने फोडफोडीचे षड्यंत्र केले गेले. कोण कोणाला चिठ्ठ्या देतेय, माईक ओढून घेतेय, हे सर्व जनता बघतेय. जनता याला उत्तर देईल. कारण जनतेला हे आवडले नाही, असे सचिन अहिर यांनी सांगितले. ते पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल

आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील, असा सूचक इशाराही सचिन अहिर यांनी दिला. तत्पूर्वी, शिवसेनेला संपवण्याची जो भाषा करतो तो स्वतःच संपतो हा इतिहास आहे, असे सांगत नव्या उमेदीने कामाला लागा व भगवा घराघरांत पोहोचवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत विविध संकटांवर मात करत राज्याचा कारभार नेटाने चालवला. देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले. हिंदुत्व हाच आमचा विचार आहे असे धाडसाने सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही कट केला. तुम्ही खासदार, आमदार, माजी आमदार पळवाल, पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही, असे परखड मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना दिला. तसेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSachin Ahirसचिन अहिरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे