शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:51 IST

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले.

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यांच्यासह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असलेले आमदारही कामाला लागले आहेत. यातच आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी झाले आहेत, पुढे जाऊन देशाचे नेतृत्व करतील, याच भीतीने फोडाफोडीचे षड्यंत्र केले जात असल्याचा मोठा आरोप शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिंकले होते. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करत होते. ते जर असेच यशस्वी झाले तर उद्या देशाचे नेतृत्व करतील, ही काहींच्या मनात भीती असल्याने फोडफोडीचे षड्यंत्र केले गेले. कोण कोणाला चिठ्ठ्या देतेय, माईक ओढून घेतेय, हे सर्व जनता बघतेय. जनता याला उत्तर देईल. कारण जनतेला हे आवडले नाही, असे सचिन अहिर यांनी सांगितले. ते पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल

आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील, असा सूचक इशाराही सचिन अहिर यांनी दिला. तत्पूर्वी, शिवसेनेला संपवण्याची जो भाषा करतो तो स्वतःच संपतो हा इतिहास आहे, असे सांगत नव्या उमेदीने कामाला लागा व भगवा घराघरांत पोहोचवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत विविध संकटांवर मात करत राज्याचा कारभार नेटाने चालवला. देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले. हिंदुत्व हाच आमचा विचार आहे असे धाडसाने सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही कट केला. तुम्ही खासदार, आमदार, माजी आमदार पळवाल, पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही, असे परखड मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना दिला. तसेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSachin Ahirसचिन अहिरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे