शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

“उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 12:30 IST

संजय राऊत यांनी उर्फी जावेद आणि दिल्लीतील प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली.

सध्या महाराष्ट्रात उर्फी जावेदचा विषय हा गाजत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या उत्तर प्रत्युत्तर सुरु होतं. दरम्यान, यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून उर्फी जावेद, पठाण अशा विषयांवरून टीका केली आहे. उर्फीमुळे भाजपचंच वस्त्रहरण झाल्याची टीकाही त्यांनी केलीये. 

मुंबईत उर्फी जावेदने भारतीय जनता पक्षाला कामास लावले. तिचे तोकडे कपडे, ‘पठाण’ चित्रपटामधील भगवी बिकिनी यावर भाजपची महिला आघाडी आंदोलन करते, पण दिल्लीच्या कंझावालमधील अंजलीस भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्याच्या गाडीखाली चिरडून मारले यावर सरकारात व भाजपमध्ये सन्नाटा आहे! उर्फी प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण झाले. अंजली प्रकरणात भाजपचे ढोंग उघडे पडल्याचे राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केलेय.

काय म्हटलेय राऊत यांनी?महाराष्ट्रात सध्याचे राजकारण पूर्णपणे रसातळाला गेले आहे. ते इतके की, राज्यात सर्व प्रश्न संपले व कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकडय़ा कपडय़ांवर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू व डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपडय़ात शूटिंग केले. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले, असे भारतीय जनता पक्षाला वाटते व त्यांनी त्या उर्फीविरुद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळय़ांचा परिणाम असा झाला की, या उर्फीला प्रसिद्धी मिळाली व तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण नक्की कोणी केले? ते भाजपने केले. उर्फीही भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सर्व टाळता आले असते. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भाजप जी फौजदारी करीत आहेत ती अनावश्यक आहे. 

‘दिल्लीत काय घडले?’उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काही पडले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करीत असते. महाराष्ट्रातील भाजप मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत जे घडले ते धक्कादायक होते. असभ्यता व क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले.

अमृता फडणवीस उर्फीच्या बाजूने उभ्या राहिल्यासर्व प्रकरणांवर आवाज न उठवता महिला नेत्यांनी उर्फी जावेदवर बोलण्यास प्राधान्य दिले. पण शेवटी उर्फी जावेदच्या बाजूने प्रत्यक्ष उभ्या राहिल्या त्या अमृता फडणवीस. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतंत्र बाणा दाखवून उर्फीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. अमृता फडणवीस म्हणतात, ‘‘उर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काही वावगे वाटत नाही.’’ थोडक्यात, श्रीमती फडणवीस यांचे म्हणणे आहे, ‘‘कपडय़ांत काय आहे? ‘व्यावसायिक’ गरजेनुसार आता प्रत्येक क्षेत्रात पोशाख आणि पेहराव येत असतो.’’

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUrfi Javedउर्फी जावेद