शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 12:30 IST

संजय राऊत यांनी उर्फी जावेद आणि दिल्लीतील प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली.

सध्या महाराष्ट्रात उर्फी जावेदचा विषय हा गाजत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या उत्तर प्रत्युत्तर सुरु होतं. दरम्यान, यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून उर्फी जावेद, पठाण अशा विषयांवरून टीका केली आहे. उर्फीमुळे भाजपचंच वस्त्रहरण झाल्याची टीकाही त्यांनी केलीये. 

मुंबईत उर्फी जावेदने भारतीय जनता पक्षाला कामास लावले. तिचे तोकडे कपडे, ‘पठाण’ चित्रपटामधील भगवी बिकिनी यावर भाजपची महिला आघाडी आंदोलन करते, पण दिल्लीच्या कंझावालमधील अंजलीस भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्याच्या गाडीखाली चिरडून मारले यावर सरकारात व भाजपमध्ये सन्नाटा आहे! उर्फी प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण झाले. अंजली प्रकरणात भाजपचे ढोंग उघडे पडल्याचे राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केलेय.

काय म्हटलेय राऊत यांनी?महाराष्ट्रात सध्याचे राजकारण पूर्णपणे रसातळाला गेले आहे. ते इतके की, राज्यात सर्व प्रश्न संपले व कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकडय़ा कपडय़ांवर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू व डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपडय़ात शूटिंग केले. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले, असे भारतीय जनता पक्षाला वाटते व त्यांनी त्या उर्फीविरुद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळय़ांचा परिणाम असा झाला की, या उर्फीला प्रसिद्धी मिळाली व तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण नक्की कोणी केले? ते भाजपने केले. उर्फीही भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सर्व टाळता आले असते. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भाजप जी फौजदारी करीत आहेत ती अनावश्यक आहे. 

‘दिल्लीत काय घडले?’उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काही पडले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करीत असते. महाराष्ट्रातील भाजप मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत जे घडले ते धक्कादायक होते. असभ्यता व क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले.

अमृता फडणवीस उर्फीच्या बाजूने उभ्या राहिल्यासर्व प्रकरणांवर आवाज न उठवता महिला नेत्यांनी उर्फी जावेदवर बोलण्यास प्राधान्य दिले. पण शेवटी उर्फी जावेदच्या बाजूने प्रत्यक्ष उभ्या राहिल्या त्या अमृता फडणवीस. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतंत्र बाणा दाखवून उर्फीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. अमृता फडणवीस म्हणतात, ‘‘उर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काही वावगे वाटत नाही.’’ थोडक्यात, श्रीमती फडणवीस यांचे म्हणणे आहे, ‘‘कपडय़ांत काय आहे? ‘व्यावसायिक’ गरजेनुसार आता प्रत्येक क्षेत्रात पोशाख आणि पेहराव येत असतो.’’

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUrfi Javedउर्फी जावेद