शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:36 PM

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात.

मुंबई : प्रजासत्ताक दिनी हल्ले करण्याचा कट तूर्त तरी कश्मीर पोलिसांनी उधळला आहे. आता लवकरच आणखी एक बातमी दिल्लीच्या दिशेने सरकेल ती म्हणजे, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनावर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या चार-पाच सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. तो उधळला गेला, अशा बातम्यांचे नवल आता कुणाला राहिलेले नसल्याचे म्हणत सामनामधून शिवसनेने सरकावर निशाणा साधण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. कॅलेंडर घेऊनच ते बिळात पडलेले असतात व राष्ट्रीय सोहळय़ांच्या तारखा पाहून बाहेर पडतात. मग ते बाहेर पडले की, त्यांचे कट कसे उधळून लावले अशा बातम्या प्रसिद्ध होतात. हे गेली कित्येक वर्षे सुरू असल्याचा टोला सामनामधून सरकारला लगावला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना जेरबंद करणे ही प्रत्येक वर्षी होणारी कारवाई आहे. आताही ते पुन्हा पकडले गेले आहेत आणि कश्मीर तसेच राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. दिल्लीचाच नव्हे तर कश्मीर खोऱ्यात फडकणारा प्रत्येक तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, असेही सामनातून शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

तर कश्मीरात सीमेपलीकडून घुसखोरी होत आहे, पण कश्मीरातील दहशतवाद्यांना सुखरूप सीमेपलीकडे नेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर होत आहे व त्याकामी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपअधीक्षकच आता पकडले गेले आहेत. पोलिसांचा वापर करून कश्मीरात सरकार काही वेगळे उद्योग करीत होते. त्यामुळे ‘पुलवामा’ हल्ल्याबाबत कोणी संशय व्यक्त केला तर देशाचे गृहमंत्रालय काय उत्तर देणार ? असा प्रश्न सुद्धा सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.