शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:38 IST

Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. बंडखोर आमदार आणि खासदारांवर शिवसेनेकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात असून, गद्दार असेच संबोधन केले जात आहे. याला शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला दूर केले नसते तर १२ खासदार आणि ४० आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला आहे. 

तब्बल वर्षभरानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात गेल्या आहेत. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या, असे सांगितले जात आहे. माझ्या विचारात फरक पडलेला नाही. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनता ही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकले कोण? याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असे गवळी यांनी म्हटले आहे. 

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही, उलट युती घट्ट केली

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे नाही माहिती आहे. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळे बोलायला पाहिजे असे नाही. बोलायची वेळ आली तर मी २५ वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झालं? बरेच काही बोलता येते, असा सूचक इशाराही भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. 

दरम्यान, ईडीचा ससेमिरा असाताना मतदारांना थेट भेटू शकत नसले, तरी संपर्कात होते. मी दोन वर्षांची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही, असेही भावना गवळी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBhavna Gavliभावना गवळीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना