शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:38 IST

Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. बंडखोर आमदार आणि खासदारांवर शिवसेनेकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात असून, गद्दार असेच संबोधन केले जात आहे. याला शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला दूर केले नसते तर १२ खासदार आणि ४० आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला आहे. 

तब्बल वर्षभरानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात गेल्या आहेत. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या, असे सांगितले जात आहे. माझ्या विचारात फरक पडलेला नाही. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनता ही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकले कोण? याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असे गवळी यांनी म्हटले आहे. 

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही, उलट युती घट्ट केली

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे नाही माहिती आहे. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळे बोलायला पाहिजे असे नाही. बोलायची वेळ आली तर मी २५ वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झालं? बरेच काही बोलता येते, असा सूचक इशाराही भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. 

दरम्यान, ईडीचा ससेमिरा असाताना मतदारांना थेट भेटू शकत नसले, तरी संपर्कात होते. मी दोन वर्षांची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही, असेही भावना गवळी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBhavna Gavliभावना गवळीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना