शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:38 IST

Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. बंडखोर आमदार आणि खासदारांवर शिवसेनेकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात असून, गद्दार असेच संबोधन केले जात आहे. याला शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला दूर केले नसते तर १२ खासदार आणि ४० आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला आहे. 

तब्बल वर्षभरानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात गेल्या आहेत. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या, असे सांगितले जात आहे. माझ्या विचारात फरक पडलेला नाही. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनता ही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकले कोण? याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असे गवळी यांनी म्हटले आहे. 

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही, उलट युती घट्ट केली

आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे नाही माहिती आहे. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळे बोलायला पाहिजे असे नाही. बोलायची वेळ आली तर मी २५ वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झालं? बरेच काही बोलता येते, असा सूचक इशाराही भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. 

दरम्यान, ईडीचा ससेमिरा असाताना मतदारांना थेट भेटू शकत नसले, तरी संपर्कात होते. मी दोन वर्षांची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही, असेही भावना गवळी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBhavna Gavliभावना गवळीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना