शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:28 IST

आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा सवालही तटकरेंनी विचारला.

गडचिरोली -  २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकदा आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते मात्र काही कारणामुळे ते नंतर पुढे घडले नाही असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खास सुनील तटकरे यांनी केला. गडचिरोली येथील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.

सुनील तटकरे म्हणाले की, २००९ नंतर पुढे २०१४ मध्येही भाजपाला पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत मग आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? अजितदादा यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण आज टीका करत आहेत, काही जणांना नैराश्य आले आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

तसेच यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टीका करत आहेत. स्वतः च्या सावलीला घाबरणाऱ्या लोकांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला त्यात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजितदादा यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेच्या मनात आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असं आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

दरम्यान, सत्तेत आलो कारण तर जनतेची, त्यांच्या विकासकामांची आम्हाला काळजी आहे या भूमिकेतूनच आपले नेते अजितदादा यांनी निर्णय घेतला मात्र यावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला परंतु हे फार काळ टिकत नाही. मात्र या भावनिक राजकारणाला थारा न देता कामाच्या रुपाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजितदादा पवार काम करत आहेत असं कौतुक महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार