शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:28 IST

आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा सवालही तटकरेंनी विचारला.

गडचिरोली -  २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकदा आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते मात्र काही कारणामुळे ते नंतर पुढे घडले नाही असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खास सुनील तटकरे यांनी केला. गडचिरोली येथील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.

सुनील तटकरे म्हणाले की, २००९ नंतर पुढे २०१४ मध्येही भाजपाला पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत मग आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? अजितदादा यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण आज टीका करत आहेत, काही जणांना नैराश्य आले आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

तसेच यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टीका करत आहेत. स्वतः च्या सावलीला घाबरणाऱ्या लोकांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला त्यात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजितदादा यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेच्या मनात आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असं आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

दरम्यान, सत्तेत आलो कारण तर जनतेची, त्यांच्या विकासकामांची आम्हाला काळजी आहे या भूमिकेतूनच आपले नेते अजितदादा यांनी निर्णय घेतला मात्र यावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला परंतु हे फार काळ टिकत नाही. मात्र या भावनिक राजकारणाला थारा न देता कामाच्या रुपाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजितदादा पवार काम करत आहेत असं कौतुक महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार