शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:34 IST

कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. ३ महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी असं आव्हान राऊतांनी केले.

नाशिक - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावर असं आक्रमण गेल्या ५०-५५ वर्षात झालं नव्हतं. बाजूचा राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला डिवचतोय, सरळ सरळ आव्हान देतोय. चुल्लू भर पाणी मे डुब जाओ म्हणतं तसे कर्नाटकनं जत तालुक्यात सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. 

नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जर तुम्हाला स्वाभिमान असेल. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणता मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. ३ महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे की नाही. जनतेचे प्रश्न समजून घ्या, जत, अक्कलकोट याठिकाणी उठाव २-३ महिन्यापासून चाललंय. या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांपुरता आहे. महाराष्ट्रात सरकार नाही त्यामुळे इतर राज्याचं आक्रमण होत आहे असं सांगत संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली. 

छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान, गुजरातच्या सभेत मल्लिकार्जुन खरगेंनी मोदी १०० तोंडाचे रावण आहेत का? असं म्हटलं. त्यावर मोदींनी अश्रू ढाळले. हा गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे असं सांगितले. त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान केला जातोय मग तुम्ही गप्प का? आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोय. रावण म्हटल्यावर गुजरातचा अपमान होतो मग छत्रपतींवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही. हा फरक भाजपाच्या विचारांचा आहे असं राऊतांनी म्हटलं. 

"शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान!

मेरा बाप गद्दार है...मी खोकेवाला खासदार नाही. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते मेरा बाप चोर है, तसं जे आमदार, खासदार सोडून गेले त्यांच्या कपाळावर मी गद्दार आहे असा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे यांचे नातेवाईक, पोरं यांच्या बायका उद्या लोकं म्हणतात हे गद्दार आहेत. पिढ्यान पिढ्या यांची गद्दारी यांना शांत बसू देणार नाही असं सांगत संजय राऊतांनी शिंदे गटावर बोचरी टीका केलीय.  

पुढील साडे ३ महिन्यात सरकार पडू शकतं३ महिन्यापासून क्रांती घडली हे कितीवेळा सांगणार? पुढच्या साडे ३ महिन्यात ते पडू शकते. राजकारण हे चंचल आहे. लोकशाहीत बहुमत त्यापेक्षा चंचल आहे. ज्याप्रकारे तुम्ही राजकीय डाव खेळताय त्यात कुणीही कुणाचं नसतं याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल. मी खात्रीने सांगतो. मी बोलतोय त्यात तथ्य आहे असा दावा संजय राऊतांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा