शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:21 IST

जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव तिथे शिवसेना, आम्ही गट मानत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली - बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या स्थानी ठेवला हे लोकांनी निदर्शनास आणले. सगळ्या गोष्टी तुम्ही सहन करताय. महाराष्ट्र स्वाभिमान, अस्मिता शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या महाराष्ट्रात दुर्दैवाने काय झालंय? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही विधान केले त्यापुढे शेपूट घातलंय. सीमावाद सुनावणी सुरू असताना महाराष्ट्रातील गावांवर बोम्मई यांनी हक्क सांगून विषय उकरून काढला. मराठी माणसांवर अत्याचार कशाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, शाब्बास शिवसेना फोडल्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाबासकीची थाप मारली. औरंगजेब, अफजल खानाला जमलं नाही, जे आम्हाला जमलं नाही तो पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दाखवला त्यासाठी ही थाप मारली असावी असं लोकांना वाटतंय. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेताना भावूक होणे हे ढोंग आहे. केवळ पंतप्रधानांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला. पण मान-सन्मान मिळेल असं वर्तवणूक कुणी केले नाही असं त्यांनी सांगितले. 

तर जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव तिथे शिवसेना. निवडणूक आयोगाच्या अधिकारावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटात सुनावणी सुरू आहे. जरी या प्रकरणात विशिष्ट बाजूने निर्णय घेण्याचा दबाव असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. राज्यातील साडे अकरा कोटी जनता डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहतायेत. शिवसेना, धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहे. आम्हाला गटतट माहित नाही. पुण्याई कुणाला पळवता येणार नाही असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला. 

महाराष्ट्राचे २ तारे, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेदरम्यान, महाराष्ट्राला ११ तारे राज्याला देतोय असं पंतप्रधान म्हणाले. त्यातील पहिले २ तारे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. या दोन्ही ताऱ्यांचा अवमान आणि अपमान झाला. छत्रपती शिवराय प्रखर सूर्य. त्यावर थुंकणारे व्यासपीठावर होते. राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना विचारतील. महाराष्ट्राचा अवमान करणारे व्यासपीठावर असताना मी इथं का बसू? असं विचारायला हवं होते. परंतु पंतप्रधानांनी जी थाप पाठीवर मारली ती शाब्बास शिवसेना फोडल्याबद्दल होती. बाळासाहेब ठाकरेंना चौथ्या स्थानावर ठेवणं हे गंभीर आहे. तुम्ही हे सहन करताय? असा सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना विचारला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना