शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Maharashtra Political Crisis: “BJP स्वतःचीच कबर खोदतेय, नितीन गडकरींचं खच्चीकरण केलं अन् देवेंद्र फडणवीसांना...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:05 IST

Maharashtra Political Crisis: अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजप देशात रुजवतेय, अशी टीका करत शिवसेनेने वर्मावरच बोट ठेवल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावरून शिंदे गटाच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतानाच शिवसेनेने भाजपच्याही वर्मावर बोट ठेवले आहे. 

शिंदे गट आणि भाजपकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. यावरून शिवसेनेच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून चांगलेच सुनावले आहे. यावेळी भाजपवरही निशाणा साधला. हे सरकारच बेकायदेशीर आहे. हे देवेंद्र फडणवीसांना कळतेय की हे सगळे बेकायदेशीर आहे. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजपा देशात रुजवतेय. ते स्वत:चीच कबर खोदत आहेत, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले. त्यांचे पाय कापून टाकले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की या सरकारमध्ये सामील होणार नाही. दोन मिनिटांत दिल्लीवरून आदेश आला शपथ घ्या. घेतली त्यांनी शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केले. सगळी खाती अंगाशी घेऊन याने कारभार होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. जे अलिबाबाचे ४० मित्र तिकडे गेले, त्यांना विचारायला हवं की त्यांना याची जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचे देशाचे नेतृत्व

आदित्य ठाकरे हे उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात. त्यांना कळून चुकलेय की, उद्याचे देशाचेही नेतृत्व कदाचित ते होतील. मग त्यांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. एक दूरदृष्टी असणारा तरुण मुलगा एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबईचे नेतृत्व करत होता. दावोसमध्ये ज्याची मुलाखत घेण्यासाठी जगातील सगळे चॅनल धावले, त्या आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच कळेल की कोण कुणावर भुंकतेय, असे सांगत विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

दरम्यान, त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे. लोकांच्या सगळे लक्षात आले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप आहेत की ज्यात ते म्हणत आहेत की आम्हाला अमुक पैसे मिळाले वगैरे. त्यामुळे अब्रू केव्हाच गेली. जो बूंद से गई, हौद से नही आएगी. कितीही पायऱ्यांवर उभे राहा. ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार, अशी बोचरी टीका अरविंद सावंतांनी केली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळArvind Sawantअरविंद सावंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी