शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:51 IST

जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले. 

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं विधान केले त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या विधानावरच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना सावध सल्ला दिला आहे. आज ते तुमच्याशी गोड बोलतील पण ते कोणाचेच नाहीत असं सांगत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जळगावात पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना एकतर तू राहतो नाहीतर मी राहतो असे म्हणाले, आज ते त्यांची पप्पी घेतायेत. आपलं स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतायेत. आपल्याला जर एवढेच होते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचारधारा सोडू नका सांगितले त्याच वेळी आमचे ऐकले असते तर आज हे दिवस आले नसते. कदाचित हे त्यांच्या लक्षात आले असेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मागील काळात जी युती झाली ती न टिकणारी होती. उद्धव ठाकरे कोणत्या विचारधारेचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले. शरद पवार आणि अजित पवार हे एकाच विचाराचे परंतु काही कारणास्तव ते वेगवेगळे झाले. काँग्रेसचा ठिकाणाच राहिला नाही. निकालामुळे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांमुळे सुरू आहे. काही दिवसांनी हे पक्ष राहतील की नाही अशी परिस्थिती आली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसशी फारकत घेतायेत, राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतायेत. राष्ट्रवादीचा एक गट नाराज असून नेतृत्व बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात यांचे डबडे वाजणार आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीला दिला.

दरम्यान, विचारधारा सोडून जे लोक लांब जात होते, भगव्या झेंड्याकरता आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आलो आहे. जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा. मी फडणवीसांना सल्ला देण्याइतका मोठा माणूस नाही पण शेवटी ज्या वेळी आपला पक्ष अडचणीत होता. मोदींचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करत होता त्यावेळी हे लोक कोणासोबत होते, आता यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यामुळे हे तुमच्याकडे येतायेत. तुमच्याशी गोड बोलतायेत पण हे लोक कुणाचेच नाही याचा निश्चितपणाने  विचार करावा अशी माझी विनंती आहे असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी