शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:51 IST

जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले. 

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं विधान केले त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या विधानावरच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना सावध सल्ला दिला आहे. आज ते तुमच्याशी गोड बोलतील पण ते कोणाचेच नाहीत असं सांगत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जळगावात पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना एकतर तू राहतो नाहीतर मी राहतो असे म्हणाले, आज ते त्यांची पप्पी घेतायेत. आपलं स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतायेत. आपल्याला जर एवढेच होते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचारधारा सोडू नका सांगितले त्याच वेळी आमचे ऐकले असते तर आज हे दिवस आले नसते. कदाचित हे त्यांच्या लक्षात आले असेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मागील काळात जी युती झाली ती न टिकणारी होती. उद्धव ठाकरे कोणत्या विचारधारेचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले. शरद पवार आणि अजित पवार हे एकाच विचाराचे परंतु काही कारणास्तव ते वेगवेगळे झाले. काँग्रेसचा ठिकाणाच राहिला नाही. निकालामुळे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांमुळे सुरू आहे. काही दिवसांनी हे पक्ष राहतील की नाही अशी परिस्थिती आली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसशी फारकत घेतायेत, राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतायेत. राष्ट्रवादीचा एक गट नाराज असून नेतृत्व बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात यांचे डबडे वाजणार आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीला दिला.

दरम्यान, विचारधारा सोडून जे लोक लांब जात होते, भगव्या झेंड्याकरता आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आलो आहे. जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा. मी फडणवीसांना सल्ला देण्याइतका मोठा माणूस नाही पण शेवटी ज्या वेळी आपला पक्ष अडचणीत होता. मोदींचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करत होता त्यावेळी हे लोक कोणासोबत होते, आता यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यामुळे हे तुमच्याकडे येतायेत. तुमच्याशी गोड बोलतायेत पण हे लोक कुणाचेच नाही याचा निश्चितपणाने  विचार करावा अशी माझी विनंती आहे असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी