शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:09 IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराऊत यांची नारायण राणेंवर गंभीर टीकाराणेंना धड हिंदी बोलता येत नाही की इंग्रजीचा तर पत्ता नाही - राऊतराष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही - राऊत

सिंधुदुर्ग : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करत अमित शाहंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली, असा दावा केला आहे. (shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra)

महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींबाबत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला आहे. 

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

नारायण राणेंच्या पत्राला केराची टोपली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणेंच्या पत्राची दखल घेतली नाही. राणे यांचे पत्र कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले, असा दावा राऊत यांनी केला. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशी टीका राऊत यांनी केली यावेळी बोलताना केली. 

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही आणि तशी वेळ येणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. राणे यांचा डोळा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर राहिला आहे. त्यांचे हे स्वप्न भविष्यात होणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अमित शाह यांना तीन दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे राणेंनी पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले होते. 

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवटNarayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण