शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:09 IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराऊत यांची नारायण राणेंवर गंभीर टीकाराणेंना धड हिंदी बोलता येत नाही की इंग्रजीचा तर पत्ता नाही - राऊतराष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही - राऊत

सिंधुदुर्ग : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करत अमित शाहंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली, असा दावा केला आहे. (shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra)

महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींबाबत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला आहे. 

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

नारायण राणेंच्या पत्राला केराची टोपली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणेंच्या पत्राची दखल घेतली नाही. राणे यांचे पत्र कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले, असा दावा राऊत यांनी केला. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशी टीका राऊत यांनी केली यावेळी बोलताना केली. 

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही आणि तशी वेळ येणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. राणे यांचा डोळा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर राहिला आहे. त्यांचे हे स्वप्न भविष्यात होणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अमित शाह यांना तीन दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे राणेंनी पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले होते. 

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवटNarayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण