शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:09 IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराऊत यांची नारायण राणेंवर गंभीर टीकाराणेंना धड हिंदी बोलता येत नाही की इंग्रजीचा तर पत्ता नाही - राऊतराष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही - राऊत

सिंधुदुर्ग : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करत अमित शाहंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली, असा दावा केला आहे. (shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra)

महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींबाबत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला आहे. 

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

नारायण राणेंच्या पत्राला केराची टोपली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणेंच्या पत्राची दखल घेतली नाही. राणे यांचे पत्र कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले, असा दावा राऊत यांनी केला. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशी टीका राऊत यांनी केली यावेळी बोलताना केली. 

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही आणि तशी वेळ येणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. राणे यांचा डोळा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर राहिला आहे. त्यांचे हे स्वप्न भविष्यात होणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अमित शाह यांना तीन दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे राणेंनी पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले होते. 

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवटNarayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण