शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 15:40 IST

Uddhav Thackeray : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत

ठळक मुद्देउद्धव ठाकरे उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर 'रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री'आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय

मुंबई : रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाल्याचे मानतो, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत येत आहेत. रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाला असे मानतो. उद्धव ठाकरे हे उद्या प्रथम लखनौला येतील. त्यानंतर लखनौहून रस्ते मार्गाने अयोध्येला येतील", असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत आल्यानंतर साडे तीन वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर 4.30 वाजता रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते असणार आहेत. तसेच, अयोध्येत शांतता राहावी. मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छित आहे. त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील. त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाही आहे. मी सर्वांना भेटलो आहे. देशातील सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहेत. त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे." 

दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तसेच, अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र, आता 7 मार्चला राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर