शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

जोपर्यंत उद्धव ठाकरेंना वाटतं तोवरच सरकार टिकेल, अन्यथा...; शिवसेना नेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:43 IST

उस्मानाबाद येथे संजय राठोड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टीकवायचं की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

ठळक मुद्देसध्यातरी सरकार स्थिर आहे परंतु ते टिकवायचे की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या हातातसरकारच्या स्थापनेपासून सरकार आता कोसळेल, इतक्या दिवसांत कोसळेल असं सांगितलं जात आहेआरोप करून त्यामागचं तथ्य पुढे येण्याअगोदरच एखाद्याला शिक्षा देणं हा चुकीचा पायंडा आपल्याला बदलला पाहिजे.

उस्मानाबाद – एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या(Shivsena) आणखी एका नेत्याने महाविकास आघाडीवर भाष्य केले आहे. जोवर उद्धव ठाकरे यांना वाटेल तोवरच महाविकास आघाडी सरकार टीकेल. सरकार चालवायचं तोपर्यंत चालवतील त्यानंतर पुढचा निर्णय घेतील असं माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटल्याने विविध तर्क लढवले जात आहेत.

उस्मानाबाद येथे संजय राठोड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टीकवायचं की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सध्यातरी सरकार स्थिर आहे परंतु ते टिकवायचे की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सरकारच्या स्थापनेपासून सरकार आता कोसळेल, इतक्या दिवसांत कोसळेल असं सांगितलं जात आहे. परंतु भाजपा(BJP) नेत्याचा दावा चुकीचा आहे. सरकार टिकवण्याचा निर्णय फक्त ठाकरेंच्या हातात आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कामगिरीचं कौतुक देशभरात झालं आहे. लोकांना शिवसेनेच्या सरकारचं काम आवडलं आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता येणार वैगेरे यात काही तथ्य नाही असं सांगत संजय राठोड यांनी सर्व पक्षांना विनंती केलीय की, आरोप करून त्यामागचं तथ्य पुढे येण्याअगोदरच एखाद्याला शिक्षा देणं हा चुकीचा पायंडा आपल्याला बदलला पाहिजे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्ष जातात. मी ३० वर्षाच्या राजकारणात ४ वेळा निवडून आलो आहे. माझ्यावर आरोप झाले. त्याची चौकशी होईल सत्य सगळ्यांसमोर येईल. काही तथ्य आढळलं तर शिक्षाही होईल. पण हा पायंडा बदला असं संजय राठोडांनी(Sanjay Rathod) आवाहन केले आहे.

 पिंपरीत संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा

पिंपरी चिंचवडमध्ये मेळाव्यावेळी संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. अजितदादाही मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत असं त्यांनी विधान करताच सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर राऊत यांनी विधानावर विनोदी शैलीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ शिवसेनेची इच्छा असेपर्यंत टिकणार असं शिवसेना नेत्यांना वाटत असल्याचं त्यांच्या विधानातून दिसून येते.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतSanjay Rathodसंजय राठोडShiv Senaशिवसेना