शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Gulabrao Patil : "या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं"; गुलाबराव पाटील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:52 IST

ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात, गुलाबराव पाटलांचा निशाणा.

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. “आमच्यावर बरीच टीका करण्यात आली. बंडखोरी केल्याचं म्हटलं. आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केलाय. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी फारक घेऊ नये म्हणून या विचारावर पुन्हा आलो आहोत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.

“माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं. अनेकांना त्यांनी पुढे आणलं. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दीघेंच्या आशीर्वादानं आम्ही आज आमदार झालो,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. ५५ आमदारांमधून ४० आमदार कसे फुटतात? आपला साधा मेंबर जरी फुटला त्याची विचारपूस आम्ही करतो. ४० आमदार फुटतात ही आजची गोष्ट नाही. बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दुख देण्याची इच्छा नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं. 

चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होताअनेकदा आमदार व्यथा मांडायला जायचे, पण चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या दोन वर्षांत कोरोना आला. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक आमदाराला बोलावून रेमडेसिवीर वाटायचेत?, धान्य वाटायचंय?, दवाखान्यातलं काम आहे का विचारलं हे आम्ही लक्षात ठेवणार नाही. आम्हाला माहित होतं शिवसेना संपणार आहे. भास्कर जाधवांनी काळजी करू नये ही शिवसेना संपणार नाही, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना उभी ठेवणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला गद्दार, गटाराचं पाणी, डुक्कर, तुमची प्रेतं बाहेर येतील, वरळीवरून जाऊ शकत नाही असं म्हटलं. धमकी द्यायचा धंदा आमचाही आहे. लेचेपेचे म्हणून आमदार झालो नाही. मनगटात जोर असलेला माणूस मैदानात येतो आणि सत्तेत सामील होतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

शिवसेना वाचवण्याची जबाबदारी आमचीशिवसेना जर संपत असेल तर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आम्ही २० आमदार होतो. शिंदे गेल्यावर आम्ही २० आमदार त्यांच्याकडे गेलो. आम्ही सांगितलं समजून घ्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला जायचं तर तुम्हीही जा म्हटलं, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. युती कायम व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमदारांची नाराजी आम्ही सांगितली, पण फोन कोणी उचलत नाही. अजित पवारांचा मला हेवा वाटायचा. विरोधीपक्षाचे आहे का सत्तेचे हे पाहणार नाही. कार्यकर्त्याला काय लागतं?, एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर एक मंत्री असा आहे, फोटो सोडा, आम्ही या देशातलेच नाही, जसं काही उधारीच मागायला आलोय, अशा प्रकारे काम चालणार असेल तर कोण थांबणार असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला.

... तरी आम्हाला किंमत नाहीआम्ही सत्तेतून दूर पळतोय तरी आम्हाला किंमत नाही. बंडखोर, आगाऊ आहोत म्हटलं जातं. तुम्ही आम्हाला मातोश्रीत या म्हणायला हवं होतं. चार लोकांच्या कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात. काय शब्द वापरतात, हे कोण सहन करणार? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटीलMaharashtraमहाराष्ट्र