शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:21 IST

बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

जळगाव – शिवसेना हा पक्ष दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, जोपर्यंत हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना आहे. शिवसेनेला संपवणारा पैदा झालेला नाही अशी घणाघाती टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. जळगावात युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेवर बरीच संकट आली, पण शिवसेना कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो असे ते म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख गेले कुठे? असं म्हणणारे पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरतील परंतु विचार मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ही संघटना सुरू आहे. बाळासाहेबांवरही संकटं आली. बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले. कुणीही म्हटलं शिवसेना संपवू मात्र बापजादे आले तरी कुणीही शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना असेच बोर्डावर लिहिलेले असायचं. आम्ही निवडणूक लढवू हे माहिती नव्हतं. आम्ही शिवसेनेत येताना निस्वार्थी आलो, आमदार, खासदार होऊ हे विचारातही नव्हतं. १९८९ साली शिवसेना भाजपा युती झाली. १९९० मध्ये शिवसेनेचे ५२ आमदार आले भाजपाचे ४२ आमदार आले. आपल्या झाडावर वाढलेल्या वेलाने आपल्याला पोखरून टाकलं आहे. युवासैनिकांची गरज आता आपल्याला आहे. प्रत्येक गावात युवा सैनिक हवा आहे असं आवाहन करत गुलाबराव पाटलांनी भाजपालाही टोला लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGulabrao Patilगुलाबराव पाटील