शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:21 IST

बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

जळगाव – शिवसेना हा पक्ष दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, जोपर्यंत हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना आहे. शिवसेनेला संपवणारा पैदा झालेला नाही अशी घणाघाती टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. जळगावात युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेवर बरीच संकट आली, पण शिवसेना कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो असे ते म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख गेले कुठे? असं म्हणणारे पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरतील परंतु विचार मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ही संघटना सुरू आहे. बाळासाहेबांवरही संकटं आली. बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले. कुणीही म्हटलं शिवसेना संपवू मात्र बापजादे आले तरी कुणीही शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना असेच बोर्डावर लिहिलेले असायचं. आम्ही निवडणूक लढवू हे माहिती नव्हतं. आम्ही शिवसेनेत येताना निस्वार्थी आलो, आमदार, खासदार होऊ हे विचारातही नव्हतं. १९८९ साली शिवसेना भाजपा युती झाली. १९९० मध्ये शिवसेनेचे ५२ आमदार आले भाजपाचे ४२ आमदार आले. आपल्या झाडावर वाढलेल्या वेलाने आपल्याला पोखरून टाकलं आहे. युवासैनिकांची गरज आता आपल्याला आहे. प्रत्येक गावात युवा सैनिक हवा आहे असं आवाहन करत गुलाबराव पाटलांनी भाजपालाही टोला लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGulabrao Patilगुलाबराव पाटील