शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:21 IST

बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

जळगाव – शिवसेना हा पक्ष दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, जोपर्यंत हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना आहे. शिवसेनेला संपवणारा पैदा झालेला नाही अशी घणाघाती टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. जळगावात युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेवर बरीच संकट आली, पण शिवसेना कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो असे ते म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख गेले कुठे? असं म्हणणारे पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरतील परंतु विचार मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ही संघटना सुरू आहे. बाळासाहेबांवरही संकटं आली. बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले. कुणीही म्हटलं शिवसेना संपवू मात्र बापजादे आले तरी कुणीही शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना असेच बोर्डावर लिहिलेले असायचं. आम्ही निवडणूक लढवू हे माहिती नव्हतं. आम्ही शिवसेनेत येताना निस्वार्थी आलो, आमदार, खासदार होऊ हे विचारातही नव्हतं. १९८९ साली शिवसेना भाजपा युती झाली. १९९० मध्ये शिवसेनेचे ५२ आमदार आले भाजपाचे ४२ आमदार आले. आपल्या झाडावर वाढलेल्या वेलाने आपल्याला पोखरून टाकलं आहे. युवासैनिकांची गरज आता आपल्याला आहे. प्रत्येक गावात युवा सैनिक हवा आहे असं आवाहन करत गुलाबराव पाटलांनी भाजपालाही टोला लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGulabrao Patilगुलाबराव पाटील