शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:21 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई - काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी, बिहारमध्ये नितीश कुमार-भाजप, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी -भाजप अशा अनपेक्षित युत्या सत्तेसाठी अस्तित्वात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाशिवआघाडी अस्तित्वात येत आहे. मात्र या महाशिवआघाडीत अनेक मुद्दयांवर वाद होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना आपल्या कणखर भूमिकेसाठी प्रसिद्ध असून सत्तेत असताना भाजपवर टीका करण्यात शिवसेनेने कधीच माघार घेतलेली नाही. शेतकरी कर्जमाफी असो वा पीकविमा या मुद्दावर शिवसेनेने भाजपला धारेवर धरले होते. परंतु, आता हीच शिवसेना कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणार आहे. अर्थात विचारधारा वेगळी असल्यामुळे शिवमहाआघाडीत वाद होण्याचा संभव आहे. 

यापैकीच एक म्हणजे स्वतंत्रवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होय. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. तर काँग्रेसमध्ये सावरकरविरोधी सूर आहे. खुद्द राहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र चळवळीतील भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तर राष्ट्रवादीची भूमिका देखील काँग्रेसला पूरकच आहे. अशा स्थितीत सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार