शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

“युती तोडून, महाविकास आघाडीसोबत जाऊन आमच्या कपाळावर जो शिक्का..,” सत्तारांचं राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 21:20 IST

“तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही,” असं राऊत म्हणाले होते.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपनं एकत्र येत राज्यात सरकारही स्थापन केलं. दरम्यान, यानंतर ठाकरे गटाकडून अनेकदा या आमदारांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्यातच खासदार संजय राऊत यांनी “तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही,” असं विधान केलं होतं. यावर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“२०१९ मध्ये यांनी युती तोडून आणि महाविकास आघाडी करून बसवलेला शिक्काच अजून मिटलेला नाही, तर नवीन कुठून येईल?” असा सवाल सत्तार यांनी केला. “त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर २०१९ मध्ये महाविकास आघाडी करताना, ज्या युतीमध्ये आम्ही निवडून आलो आणि त्यांना धोका देऊन जे सरकार स्थापन केलं. त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पराहावं. ते काही दिवस राहिले होते तेव्हा झाला असेल असं मला वाटतं,” असं सत्तार म्हणाले.

“भाजप आणि शिंदे साहेब एकमेकांच्या विश्वासाने निर्णय घेतात. त्यामुळे कोणीही नाराज नाही किंवा बॅकफुटवर नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समन्वयाने सरकार चालवत आहेत. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला दिसेल. या निवडणुकांमध्ये आमची पहिली परीक्षा होईल. मला वाटतं की फडणवीसांचा अनुभव आणि केंद्राचा मोठा पाठिंबा आम्हाला निधीच्या माध्यमातून मिळतोय. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंची निवड केली यासाठी मी त्यांचे आभार मानेन. चालत्या फिरत्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्रिपद मिळू शकतं असा निर्णय मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलाय,” असं सत्तार यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAbdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtraमहाराष्ट्र