शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेची तयारी सुरु! शिवसेनेचे ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:44 IST

एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विधान परिषदेच्या तयारी लागल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई: एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीची मते फुटू नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलवर नेले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपसोबत झालेली बोलणी फिस्कटल्यामुळे राज्यसभा निवडणूक होणारच, हे निश्चित झाले. आता सगळी मदार अपक्षांवर असून, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. मात्र, यातच आता शिवसेनेने विधान परिषदेची तयारी सुरू केली असून, दोन नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे राज्यसभेचे चारही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. मग शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता पुन्हा संकटमोचक म्हणून ओळख असणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.  

एकाला संधी, एकाचे पुनर्वसन करणार?

दुसरीकडे शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी सर्वांत पुढे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर, शिवसेना नेते आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चाही आहे. २०१९मध्ये पाडवी यांना याच मतदारसंघात काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे कोल्हापुरातून संजय पवार आणि अक्कलकुवातून आमशा पाडवी अशा स्थानिक नेतृत्वाला शिवसेनेकडून संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपसाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभा निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे