शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचा दिवस असतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 09:16 IST

भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते. पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? : उद्धव ठाकरे

 मुंबई : ‘धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचे दिवस येतात’, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर केंद्र आणि भाजपला एका कार्यक्रमात बोलताना सुनावले. मुख्यमंत्री म्हणाले की पश्चिम बंगाल अन् महाराष्ट्र ही दोनच राज्ये केंद्रीय यंत्रणांना दिसत आहेत. तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो ना, जरूर काढा, पण त्यामागे विकृतीची लागण दिसते. ही साथ पसरायची नसेल तर लवकरात लवकर बदल करावा लागेल. 

जनतेचा आशीर्वाद नसताना सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणारच या केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे राजकारण नासवून टाकले आहे आणि त्यातूनच केंद्र व राज्य संघर्ष सुरू झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही काय धुणीभांडी करायची का?भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? त्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला हाणला. भाजपसोबत युतीच्या शक्यतेबाबत ते म्हणाले की भाजप आधी सुधारणार आहे का? त्यांची वैचारिक पातळी पाताळात गेली आहे. कुणाहीबरोबर जाण्याचा त्यांचाच कित्ता आम्ही गिरविला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा