शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 10:20 IST

Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक संकटात सापडलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात पदार्पण करू शकतात, या शक्यतेवर आदित्य ठाकरेंनी नेमकी प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे. 

शिवसेना सध्या ऐतिसहासिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही युवासेनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. या चर्चेबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खुलासा केला आहे.

तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल

आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा फेटाळून लावली आहे. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा यायचे, तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना विरोधक करत असलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणि ते राजकारणात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न ते करत आहे. मात्र त्यांनी एवढी कारणे दिली आहेत की मी शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारण बदललेले असते. कोणालाही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे