शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:56 IST

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. असा प्रकल्प जाण्याचा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचे प्रकरण तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडले असते, तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत. आधी दहीहंडी, गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत २५० मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

एअरबस आणि टाटा प्रकल्पांबद्दल सरकारला माहितीच नाही

आमचे सरकार असताना एअरबस आणि टाटा यांचे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, आताच्या सरकारला असे काही सुरू होते, याबाबत साधी माहितीही नाही. आम्ही सांगितल्यावर आता पाठपुरावा करतोय म्हणून सांगत फिरतायत. ही या सरकारची अवस्था आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरीकडे, बंडखोरांबद्दल पुन्हा एका तोंडसुख घेत, आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे