शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:56 IST

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. असा प्रकल्प जाण्याचा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचे प्रकरण तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडले असते, तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत. आधी दहीहंडी, गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत २५० मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

एअरबस आणि टाटा प्रकल्पांबद्दल सरकारला माहितीच नाही

आमचे सरकार असताना एअरबस आणि टाटा यांचे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, आताच्या सरकारला असे काही सुरू होते, याबाबत साधी माहितीही नाही. आम्ही सांगितल्यावर आता पाठपुरावा करतोय म्हणून सांगत फिरतायत. ही या सरकारची अवस्था आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरीकडे, बंडखोरांबद्दल पुन्हा एका तोंडसुख घेत, आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे