शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:56 IST

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. असा प्रकल्प जाण्याचा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचे प्रकरण तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडले असते, तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत. आधी दहीहंडी, गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत २५० मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

एअरबस आणि टाटा प्रकल्पांबद्दल सरकारला माहितीच नाही

आमचे सरकार असताना एअरबस आणि टाटा यांचे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, आताच्या सरकारला असे काही सुरू होते, याबाबत साधी माहितीही नाही. आम्ही सांगितल्यावर आता पाठपुरावा करतोय म्हणून सांगत फिरतायत. ही या सरकारची अवस्था आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरीकडे, बंडखोरांबद्दल पुन्हा एका तोंडसुख घेत, आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे