शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिर्डी विमानतळाचे संरक्षण सीआयएसएफकडे, घातपाताच्या शक्यतेचा परिणाम; प्रवासीसंख्या वाढविण्याकडेही कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:35 IST

शिर्डी विमानतळाला लवकरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ आॅक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले.

नवी दिल्ली : शिर्डी विमानतळाला लवकरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ आॅक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले.संभाव्य दहशतवादी हल्ले किंवा विमानतळाला घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे संरक्षण दिले जात आहे. सीआयएसएफ, नागरी उड्डयन सुरक्षा विभाग आणि विमानतळाचे आॅपरेटर लवकरच विमानतळाची पाहणी करतील. सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सुरक्षेबाबत विनंती मिळाली असून सुरक्षा कशी पुरवायची यावर विचार सुरू आहे, असे सांगितले. देशातील ५९ विमानतळांना सीआयएसएफकडून सुरक्षा दिली गेलेली आहे.मुंबईपासून शिर्डी २३८ किलोमीटर आहे. सुमारे ६० हजार भाविक रोज शिर्डीला भेट देतात त्यातील किमान १०-१२ टक्के आपल्याकडे वळवायची विमानतळ अधिकाºयांची योजना आहे. हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मालकीचे असून तिनेच ते विकसित केले आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्याची धावपट्टी २,५०० मीटरची असून एअरबस ए३२० आणि बोइंग ७३७एससारख्या सिंगल नॅरो-बॉडी विमानांना हे विमानतळ हाताळण्यास सक्षम आहे. २,७५० चौरस मीटरची टर्मिनल बिल्डिंग ३०० प्रवाशांना एका वेळेस हाताळू शकते.कमांडोंचा २४ तास पहारा-शिर्डीपासून औरंगाबाद हे जवळचे विमानतळ १२५ किलोमीटरवर आहे. सीआयएसएफने बुधवारी पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या टेलेमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कच्या सुरक्षेचे काम हाती घेतले आहे. कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी शिर्डी विमानतळावर निमलष्करी दलाचे ६० सशस्त्र कमांडोज २४ तास पहारा देतील.

टॅग्स :Shirdi Airportशिर्डी विमानतळ