शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी माणसाने बलात्कार केला तरी त्याला..."; काँग्रेस प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावरुन शिंदे गट संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 18:43 IST

बदलापूर अत्याचार प्ररकरणावरुन काँग्रेस प्रवक्त्याने केलेल्या विधानावरुन शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्ररकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. राज्यासह देशभरातून या प्रकरणाविषयी रोष व्यक्त केला. राज्यातही या प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणावरुन आता राजकारण देखील सुरु झालंय. सत्ताधारी आणि विरोधक यावरुन एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने या बलात्कार प्रकरणाविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुनच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवरुन महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडीने महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दुसरीकडे देशपातळीवरही या घटनेवरुन निषेध नोंदवण्यात येत आहे. मात्र एका चॅनेलच्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या प्रवक्त्याने वादग्रस्त विधान केलं. यावरुनच आता शिंदे गट आक्रमक झाला असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांनी चर्चा सत्रादरम्यान, बदलापूर प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केलं. जर मराठी माणसाने बदलापूरमध्ये बलात्कार केला तर त्यालाही तुम्ही वाचवणार का? असं वक्तव्य आलोक शर्मा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन चर्चेसाठी आलेल्या भाजपच्या शहजाद पुनावाला यांनी आक्षेप घेत शर्मा यांचा विरोध केला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी शर्मा यांना धडा शिकवणार असल्याचे म्हटलं आहे. 

"मी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. त्यांनी मराठी समाजाला बलात्कारी म्हटले आहे. आम्ही त्यांना धडा शिकवू. काँग्रेसने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना गुलाम बनवले आहे. म्हणून ते मराठी समाजाचा अनादर करू शकत नाहीत. आम्ही खरे शिवसैनिक आहोत आणि मराठी माणसाच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी आम्ही काँग्रेससोबत लढू," असे राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "काँग्रेसच्या प्रवक्त्याने मराठी माणसाच्या विरोधात जे विधान केलं त्याचा मी निषेध करतो. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना विचारु इच्छितो की, तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या सोबत आहात की काँग्रेससोबत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुंबईला इथपर्यंत नेणाऱ्या मराठी माणसाविषयी असे म्हटलं जात असेल तर तुम्ही काँग्रेसचे समर्थन करणार आहात का?," असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं. 

टॅग्स :badlapurबदलापूरcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे