शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 06:36 IST

सुप्रीम कोर्ट : बिल्डरांना मोकळ्या जागा देण्याच्या प्रवृत्तीवरही कठोर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नवी मुंबईत क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी निश्चित केलेल्या जमिनीचे वाटप रद्द करून या बदल्यात रायगड जिल्ह्यात जमीन देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १ जुलै २०२४ रोजी रायगड जिल्ह्यात क्रीडा संकुल हलवण्याचा निर्णय रद्द केला होता. त्या निर्णयाला शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

२००३ मध्ये राज्य सरकारकडून नवी मुंबईतील घणसोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी २० एकर जागा निश्चित केली होती. नंतर राज्य सरकारने हे क्रीडा संकुल घणसोली येथून ११५ किमी दूर रायगडमधील नानोरे गावात हलविण्याचा निर्णय घेतला. याविरुद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, नवी मुंबई चॅप्टरने जमिनीच्या या पुनर्वाटपाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

विशेष म्हणजे, जमिनीचे पुनर्वाटप केल्यानंतर, सिडकोने संकुलासाठी आधी निश्चित केलेल्या जमिनीचा काही भाग प्रोग्रेसिव्ह होम्स बिल्डरला दिला होता. त्यावर १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका मंजूर करून हे पुर्नवाटप रद्द केले, याबरोबरच प्रोग्रेसिव्ह होम्स बिल्डरला जमीन देण्याची सिडकोची अधिसूचनाही रद्दबातल ठरविली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची सुनावणी शुक्रवारी झाली तेव्हा, राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, क्रीडा संकुलाच्या दोन श्रेणी आहेत. एक प्रादेशिक आहे जे सध्या सुरू आहे आणि ३६ एकरमध्ये विस्तारत आहे. दुसरे राज्यस्तरीय क्रीडा संकुल आहे. हायकोर्टाने जनहित याचिका मंजूर करताना 'टाउन प्लॅनिंग'च्या कक्षेत प्रवेश केला आहे, असे म्हणत त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला. मात्र, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिसरा यांच्या खंडपीठाला हा युक्तिवाद पटला नाही.

सरन्यायाधीशांची गंभीर टिप्पणी"महाराष्ट्रातील सार्वजनिक संस्थांनी काय केले आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? जी काही हरित जागा शिल्लक राहिली आहे ती संपूर्णपणे उचलून बिल्डरांना दिली जाते. ती नंतर विस्तीर्ण शहरे बनतात. जिथे लोकांना खेळायला जागा नाही की फिरायला जागा नाही..."

‘आम्ही फक्त बांधतो, बांधतो आणि बांधतो’ राज्य सरकारच्या निर्णयात स्पष्ट गैरप्रकार आहेत. तुम्ही नवी मुंबईची जागा बदलून ११५ किमी अंतरावर क्रीडा संकुलासाठी जागा देत आहात. तिथे कोण जाईल खेळायला? हरित जागांची आपल्याला खूप गरज आहे. कदाचित नवी मुंबईच्या सेक्टर १३ आणि सेक्टर १२ ही शेवटची ग्रीन स्पेस आहे - आता सेक्टर १२ पूर्णपणे व्यावसायिक मॉल्समध्ये जाईल. ही शहराची शेवटची काही फुफ्फुसे आहेत. तुम्हाला हे भाग जपायला हवेत. तुम्ही आमच्या शहरांचे काय करीत आहात? आम्ही फक्त बांधतो, बांधतो आणि बांधतो" असे सरन्यायाधीश म्हणाले. हे ऐकल्यानंतर सॉलिसिटर जनरलनी राज्य सरकारकडून सूचना मागविण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत मुदत मागितली आहे.

सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का?पायाभूत सुविधा आणि मनोरंजन पार्क, गार्डन, क्रीडा संकुल यांसारख्या भविष्यात अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांना डावलून अशा प्रकारचे कॉक्रिटीकरण कितपत वाढविता येईल, याचा विचार सरकार आणि नियोजन प्राधिकरणांनी करावा. सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का? महसुलाच्या उद्देशाने सरकारी प्राधिकरणे सरकारी जमिनींचे आणखी किती शोषण करणार? असा सवालही न्यायालयाने केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय