शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 23:36 IST

प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले

कोल्हापूर – एकदा निवडणुकीपूर्वी मला ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस आल्यानंतर मी उद्या काय आत्ताच येतो सांगितले. मी येतोय जाहीर केले त्यानंतर ईडीचे अधिकारी, पोलीस आयुक्त घरी आले. तुम्ही आता ईडी कार्यालयात जाऊ नका, बँकेच्या व्यवहारासाठी मला ईडी नोटीस पाठवली. ज्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेत माझी ठेव नव्हती. काहीही नव्हते पण एकप्रकारे भीती घालण्यासाठी नोटीस पाठवली. आज असं धाडस लोकांनी दाखवले पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असते त्याला चिंता करण्याचे कारण नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोल्हापूरच्या सभेत शरद पवारांनीअजित पवार गटातील नेत्यांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले की, सत्तेचा वापर विरोधी पक्षातील लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरली जाते. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते, स्पष्ट भूमिका घेत होते. त्यामुळे त्यांना आवार घालायचं म्हणून खोटा खटला दाखल केला. १२ महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. परंतु हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगितले, तुम्ही आमच्या पक्षात या, गटात या जर आला नाही तर तुमची जागा आत आहे. देशमुखांनी स्पष्ट सांगितले. माझी जागा तुरुंगात असो वा कुठेही मी सत्याची साथ सोडणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तर आज सामनाचे संपादक संजय राऊत ते लिहितात, त्यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनाही सांगितले तुम्ही हे बंद करा, ते म्हणाले सत्य लिहिण्याचा अधिकार माझा आहे. तो मी बंद करणार नाही म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते, प्रवक्ते, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत होते त्यांनाही तुरुंगात टाकले. २ महिन्यासाठी त्यांना जामीन मिळाला आहे. प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले असा चिमटा शरद पवारांनी भाजपाला काढला.

दरम्यान, देशमुख, मलिक, राऊत घाबरले नाहीत, पण आज राजकारण कसं बदलतंय त्यादृष्टीने पाऊले टाकली जातेय. महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही लोकांना दिला, काहींनी धुडकावले तर काहींनी भूमिका बदलली. कोल्हापूरचा इतिहास श्रौर्याचा आहे. इथे ईडीची नोटीस आल्यावर त्याला सामोरे जाण्याची ध्येय दाखवतील असं मला वाटलं परंत चित्र वेगळे निघाले. कोल्हापूरात ईडीची नोटीस आली, घरी सीबीआय, आयकर खात्याचे लोक गेले. आमच्यासोबत काम करणारे लोक मला वाटलं स्वाभिमान असेल. ज्या घरातील भगिनी म्हणते, तुम्ही एकवेळ गोळ्या घाला, पण असा त्रास देऊ नका, त्या घरातील कर्ता पुरुष असं म्हटलेले ऐकलं नाही. ज्या भगिनींनी धाडस दाखवले तसं धाडस दाखवण्याऐवजी भाजपासोबत जाऊन ईडीपासून सुटका करू अशी भूमिका त्यांनी घेतली असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात केला.

शेतकऱ्यांचा अपमान देशाच्या इतिहासात कुणी केला नसेल तितका मोदी सरकारने केला

ऊसाचं पीक घेणारा हा जिल्हा, इथं साखर, गूळ तयार होते. परंतु साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे. सप्टेंबरपासून साखर निर्यात होणे बंद होईल. त्यामुळे साखरेची किंमत मिळणार नाही. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. जे जे शेतकरी तयार करतो त्याला आवर कसा घालायचा ही भूमिका सरकारची आहे. दिल्लीत १ वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, कुटुंबासह १२ महिने दिल्लीच्या सीमेवर बसले होते. पण मोदी सरकारने त्यांच्याकडे पाहिले नाही. शेतकऱ्यांचा अपमान मोदी सरकार इतका दुसऱ्या कुठल्याही सरकारने देशाच्या इतिहासात केला नाही. त्यामुळे अशांना सत्तेत बसवायचे की नाही याचा निकाल जनतेला घ्यायचा आहे असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफ