शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 23:36 IST

प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले

कोल्हापूर – एकदा निवडणुकीपूर्वी मला ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस आल्यानंतर मी उद्या काय आत्ताच येतो सांगितले. मी येतोय जाहीर केले त्यानंतर ईडीचे अधिकारी, पोलीस आयुक्त घरी आले. तुम्ही आता ईडी कार्यालयात जाऊ नका, बँकेच्या व्यवहारासाठी मला ईडी नोटीस पाठवली. ज्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेत माझी ठेव नव्हती. काहीही नव्हते पण एकप्रकारे भीती घालण्यासाठी नोटीस पाठवली. आज असं धाडस लोकांनी दाखवले पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असते त्याला चिंता करण्याचे कारण नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोल्हापूरच्या सभेत शरद पवारांनीअजित पवार गटातील नेत्यांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले की, सत्तेचा वापर विरोधी पक्षातील लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरली जाते. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते, स्पष्ट भूमिका घेत होते. त्यामुळे त्यांना आवार घालायचं म्हणून खोटा खटला दाखल केला. १२ महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. परंतु हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगितले, तुम्ही आमच्या पक्षात या, गटात या जर आला नाही तर तुमची जागा आत आहे. देशमुखांनी स्पष्ट सांगितले. माझी जागा तुरुंगात असो वा कुठेही मी सत्याची साथ सोडणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तर आज सामनाचे संपादक संजय राऊत ते लिहितात, त्यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनाही सांगितले तुम्ही हे बंद करा, ते म्हणाले सत्य लिहिण्याचा अधिकार माझा आहे. तो मी बंद करणार नाही म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते, प्रवक्ते, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत होते त्यांनाही तुरुंगात टाकले. २ महिन्यासाठी त्यांना जामीन मिळाला आहे. प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले असा चिमटा शरद पवारांनी भाजपाला काढला.

दरम्यान, देशमुख, मलिक, राऊत घाबरले नाहीत, पण आज राजकारण कसं बदलतंय त्यादृष्टीने पाऊले टाकली जातेय. महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही लोकांना दिला, काहींनी धुडकावले तर काहींनी भूमिका बदलली. कोल्हापूरचा इतिहास श्रौर्याचा आहे. इथे ईडीची नोटीस आल्यावर त्याला सामोरे जाण्याची ध्येय दाखवतील असं मला वाटलं परंत चित्र वेगळे निघाले. कोल्हापूरात ईडीची नोटीस आली, घरी सीबीआय, आयकर खात्याचे लोक गेले. आमच्यासोबत काम करणारे लोक मला वाटलं स्वाभिमान असेल. ज्या घरातील भगिनी म्हणते, तुम्ही एकवेळ गोळ्या घाला, पण असा त्रास देऊ नका, त्या घरातील कर्ता पुरुष असं म्हटलेले ऐकलं नाही. ज्या भगिनींनी धाडस दाखवले तसं धाडस दाखवण्याऐवजी भाजपासोबत जाऊन ईडीपासून सुटका करू अशी भूमिका त्यांनी घेतली असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात केला.

शेतकऱ्यांचा अपमान देशाच्या इतिहासात कुणी केला नसेल तितका मोदी सरकारने केला

ऊसाचं पीक घेणारा हा जिल्हा, इथं साखर, गूळ तयार होते. परंतु साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे. सप्टेंबरपासून साखर निर्यात होणे बंद होईल. त्यामुळे साखरेची किंमत मिळणार नाही. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. जे जे शेतकरी तयार करतो त्याला आवर कसा घालायचा ही भूमिका सरकारची आहे. दिल्लीत १ वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, कुटुंबासह १२ महिने दिल्लीच्या सीमेवर बसले होते. पण मोदी सरकारने त्यांच्याकडे पाहिले नाही. शेतकऱ्यांचा अपमान मोदी सरकार इतका दुसऱ्या कुठल्याही सरकारने देशाच्या इतिहासात केला नाही. त्यामुळे अशांना सत्तेत बसवायचे की नाही याचा निकाल जनतेला घ्यायचा आहे असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफ