शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

अजितदादांच्या राजीनाम्याबाबत खुद्द शरद पवारच अंधारात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 20:36 IST

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या अजित पवार यांनी आज आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. कारण गुलदसत्यात असताना अजितदादांच्या या पावलाबाबत खुद्द शरद पवारच अंधारात होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले होते. मात्र, ईडीचा खुलासा आणि पोलिसांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी जाणे रद्द केले होते. यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. 

ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केल्यानंतर शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी रवाना झाले. मात्र, अजित पवार तेव्हा मुंबईत होते, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समक्षच अजितदादांना बारामती मतदारसंघात पूरग्रस्तांसाठी थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तरीही अजितदादा मुंबईत आले आणि त्यांनी सायंकाळी विधानसभाध्यक्षांच्या पीएकडे 5.40 राजीनामा दिला. यामुळे जर अजित पवार राजीनाम्याचे पाऊल उचलणार होते तर शरद पवार पुण्याकडे कसे रवाना होऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. 

निवडणुकीची पार्श्वभूमी आणि ईडीला नमविल्याचा आवेश असताना अजित पवारांचा एवढा मोठा निर्णय शरद पवारांना अंधारात ठेवून घेतला का, असा सवालही समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी अरण्येश्वरला जाणार होते. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे कळताच त्यांनी हा दौरा रद्द करत पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली. यामुळे अजित पवारांनी खुद्द शरद पवारांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा होत आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड