शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अजितदादांच्या राजीनाम्याबाबत खुद्द शरद पवारच अंधारात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 20:36 IST

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या अजित पवार यांनी आज आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. कारण गुलदसत्यात असताना अजितदादांच्या या पावलाबाबत खुद्द शरद पवारच अंधारात होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले होते. मात्र, ईडीचा खुलासा आणि पोलिसांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी जाणे रद्द केले होते. यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. 

ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केल्यानंतर शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी रवाना झाले. मात्र, अजित पवार तेव्हा मुंबईत होते, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समक्षच अजितदादांना बारामती मतदारसंघात पूरग्रस्तांसाठी थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तरीही अजितदादा मुंबईत आले आणि त्यांनी सायंकाळी विधानसभाध्यक्षांच्या पीएकडे 5.40 राजीनामा दिला. यामुळे जर अजित पवार राजीनाम्याचे पाऊल उचलणार होते तर शरद पवार पुण्याकडे कसे रवाना होऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. 

निवडणुकीची पार्श्वभूमी आणि ईडीला नमविल्याचा आवेश असताना अजित पवारांचा एवढा मोठा निर्णय शरद पवारांना अंधारात ठेवून घेतला का, असा सवालही समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी अरण्येश्वरला जाणार होते. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे कळताच त्यांनी हा दौरा रद्द करत पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली. यामुळे अजित पवारांनी खुद्द शरद पवारांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा होत आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड