शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेल्या राहुल गांधींना पवारांनी फटकारले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:37 IST

चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

ठळक मुद्देदेशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही १९६२ च्या युद्धात चीनने भारताचा लखाडमधील सुमारे ४५ हजार चौकिमी भूभाग बळकावला होता, तो अद्याप परत मिळवता आलेला नाहीतिथे संघर्ष झाला याचा अर्थ आपले जवान जागरूक होते. जर तसे नसते तर चिनी सैनिक कधी आले आणि गेले ते कळलंच नसतं

सातारा - चीननेलडाखमधील काही भागात केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट होऊन त्यात भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या देशात तणावाचे वातावरण आहे. तसेच चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राहुल गांधी यांना फटकारले आहे. तसेच १९६२ च्या युद्धात चीनने भारताचा लखाडमधील सुमारे ४५ हजार चौकिमी भूभाग बळकावला होता, तो अद्याप परत मिळवता आलेला नाही, अशी आठवणही पवार यांनी यावेळी करून दिल्ली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी लडाखमधील घुसखोरीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असला तरी चीन आणि भारत यांच्यात यु्द्ध होण्याची शक्यता कमी आहे. गलवानमधून दौलत बेग ओल्डीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या भारत सरकारकडून सुरू आहे. या रस्त्याचा एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला चीनचा ताबा आहे. त्यामुळे चीनचे सैनिक या रस्त्यावर येत असतात. त्यातूनच गलवानमध्ये झटापट झाली.

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या झटापटीवेळी शस्त्रांचा वापर होत नाही. त्यासाठी आपण संरक्षण मंत्री असताना चीनमध्ये जाऊन केलेल्या वाटाघाटी आणि नंतर नरसिंह राव यांच्या नेतृत्वात चीनसोबत झालेल्या कराराचे असलेले महत्त्वही पवार यांनी सांगितले. दोन देशांच्या सैन्यामध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हा गोळीबारासारख्या घटना घडतात. मात्र गलवानमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली तेव्हा गोळीबार झाला नाही. त्याचे कारण हा करार आहे. चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्या जवानांनी त्यांना रोखले. त्यातून पुढे संघर्ष झाला. गस्त सुरू असताना कुणी आडवं आलं आणि संघर्ष झाला तर त्याला संरक्षण मंत्रालयाचं अपयश म्हणता येणार नाही. तिथे संघर्ष झाला याचा अर्थ आपले जवान जागरूक होते. जर तसे नसते तर चिनी सैनिक कधी आले आणि गेले ते कळलंच नसतं, असे विधान पवार यांनी केले.

यावेळी पवार यांनी १९६२ च्या युद्धाची आठवण करून देत  राहुल गांधी यांना अनुभवाचे बोलही सुनावले. आता लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत काही माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमी भाग सध्या चीनच्या ताब्यात आहे. तो भाग आपल्याला अद्याप मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे असे आरोप करताना आपण भूतकाळात आपण काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण आणणे योग्य नाही, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीladakhलडाखIndiaभारतchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकार