शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:07 IST

Sharad Pawar News: उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र कसे बदलणार आणि नवीन काय करणार, याबाबत प्रधानमंत्री अवाक्षर काढत नाही. केवळ टीका करत राहतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: देशाचे प्रधानमंत्री  महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लोकांवर बोलतात. एक शरद पवार आणि दुसरे आहेत आमचे उद्धव ठाकरे. या ठाकरेंवर, शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची.  माझ्यावर त्यांनी सांगितले काय? महाराष्ट्रामध्ये एक माणूस ४५ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय आणि लोकांचे सरकार अस्थिर करतोय, ही गमतीची गोष्ट आहे.  महाराष्ट्रात मी फिरतोय, माझे राज्य आहे, माझे लोक आहेत, त्यांच्यासमोर  जाणार, त्यांच्याबरोबर बोलणार हा लोकशाहीचा माझा अधिकार, पण ते सुद्धा सहन  होत नाही. त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हा लोकांवर अधिक आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार शरद पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना घेतला. महाराष्ट्राची निवडणूक आहे, आणि ती निवडणूक पाच टप्प्यात आहे. अशी गंमतीची  गोष्ट आहे. तमिळनाडू राज्य. तिथे एकंदरीत खासदारांची संख्या ४०. आणि ४०  जणांची निवडणूक एका दिवशी. महाराष्ट्राच्या खासदारांची संख्या ४८. इथली  निवडणूक पाच दिवसांची, उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि  महाराष्ट्राची ५ दिवसांत. हे कशासाठी, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.

ही निवडणूक नियमानुसार होत असली तरी समान संधी मिळत नाही

या देशाचे  प्रधानमंत्री, ज्यांना जिथे आपली शक्ती कमी असे वाटते, त्या ठिकाणची  निवडणूक एकाऐवजी ४-४ दिवस आणि त्यांना टिका टिप्पणीच करता येते. अनेक ठिकाणी ते सभा घेतात. सभा घ्यायला काही  हरकत नाही, पण एका पक्षाला तुम्ही १० वेळेला सभा घ्यायला संधीही देता आणि  काही पक्षांना एका दिवसात संपवा म्हणून सांगता. याचा अर्थ ही निवडणूक  नियमानुसार होत असेल, पण समान संधी याठिकाणी मिळत नाही. अनेक प्रश्न पुढे आहेत. कुणीही आणि विशेषत: प्रधानमंत्री असेल, अशा  व्यक्तीने दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र आम्ही कसे बदलणार आहोत, नवीन काय करणार आहोत आणि मग टीका टिप्पणी करायची  असेल तर ती करता येते, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, देशाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी स्वच्छ प्रामाणिकपणाने वस्तुस्थिती सांगायला हवी. ती न सांगता इतरांवर टीका करायची आणि चुकीच्या गोष्टी सांगायच्या. ते सांगतात, आमच्या हातात  सत्ता आली की, भ्रष्टाचार खत्म करू. आज काय चित्र दिसतेय? सर्वत्र  भ्रष्टाचार, आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालत आहे.  आज सत्तेचा गैरवापर करणे ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी