शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला आहे का?"; जयंत पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:39 IST

Bridge Collapse: सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

Mumbai Goa Highway Bridge Collapse: मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरावस्था या नेहमीच चर्चेचा विषय असतो. या रस्त्यांवरील खड्डे, त्यांचा दर्जा याबद्दल कायमच टीका केली जाते. तशातच आज या महामार्गावर चिपळूणजवळ एक मोठी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. त्यात आज सकाळी पुलाच्या गर्डरचा भाग मधोमध तुटला आणि त्यातला काही भाग रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दर्जाबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे, "मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासीयांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा."

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाला आहे. पुलाच्या गर्डरचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग कोसळला तो थेट खालच्या रस्त्यावर कोसळला. सुदैवाने जेव्हा ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर कोणीही पुलाखाली नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. अशातच हा प्रकार घडल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकारAccidentअपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेस