शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला आहे का?"; जयंत पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:39 IST

Bridge Collapse: सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

Mumbai Goa Highway Bridge Collapse: मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरावस्था या नेहमीच चर्चेचा विषय असतो. या रस्त्यांवरील खड्डे, त्यांचा दर्जा याबद्दल कायमच टीका केली जाते. तशातच आज या महामार्गावर चिपळूणजवळ एक मोठी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. त्यात आज सकाळी पुलाच्या गर्डरचा भाग मधोमध तुटला आणि त्यातला काही भाग रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दर्जाबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे, "मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासीयांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा."

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाला आहे. पुलाच्या गर्डरचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग कोसळला तो थेट खालच्या रस्त्यावर कोसळला. सुदैवाने जेव्हा ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर कोणीही पुलाखाली नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. अशातच हा प्रकार घडल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकारAccidentअपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेस