शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला आहे का?"; जयंत पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:39 IST

Bridge Collapse: सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

Mumbai Goa Highway Bridge Collapse: मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरावस्था या नेहमीच चर्चेचा विषय असतो. या रस्त्यांवरील खड्डे, त्यांचा दर्जा याबद्दल कायमच टीका केली जाते. तशातच आज या महामार्गावर चिपळूणजवळ एक मोठी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. त्यात आज सकाळी पुलाच्या गर्डरचा भाग मधोमध तुटला आणि त्यातला काही भाग रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दर्जाबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे, "मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासीयांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा."

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाला आहे. पुलाच्या गर्डरचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग कोसळला तो थेट खालच्या रस्त्यावर कोसळला. सुदैवाने जेव्हा ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर कोणीही पुलाखाली नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. अशातच हा प्रकार घडल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकारAccidentअपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेस