शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:41 IST

बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित  शाळेत दोन चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केले होते. हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. आता या घटनेवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. या आंदोलनातून केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

बदलापूरची घटना आणि राज्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी या बंदमधून लोकांनी महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त कराव्यात असं म्हटलं आहे.

"काल जे काही म्हणाले ते बदलापूरपर्यंत सीमित नव्हतं. त्याआधी तीन चार दिवसापूर्वीही काही ना काही घटना घडल्याचे दिसले. बालिकांवील, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच्याबद्दल लोकांमध्ये असलेला उद्रेक आणि राग हा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. हा बंद अत्यंत शांततेणे पाळण्यात यावा. माझ्या पक्षासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी व्हावं. याच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त करणे हा त्याचा हेतू आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आम्ही तिथे काय गेलो नव्हतो. पण माझ्या मते त्यावेळी कोण कुठल्या राजकीय पक्षाचे नव्हतं. असा प्रकार झाल्यानंतर त्याच्यावर ते राजकीय होतं अशी टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री असं बोलले नसतं तर योग्य झालं असतं. हा प्रश्न लोकांच्या संवेदना व्यक्त करण्याचा आहे. इथं कुणीही राजकारण आणलं नाही. आमच्या लोकांच्या मनातही नव्हत की अशाप्रकारे राजकीय काही करावं. केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. याच्याकडे त्या दृष्टीकोनातून बघू नये," असंही शरद पवार म्हणाले.  

"या घटना थांबताना नाही तर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटी समाजाला जागृत करावं लागेल. तसेच कायद्याच्या यंत्रणेलाही जागं करावं लागेल. मी कोणाला दोष देत नाही. पण हे न घडण्यासाठी जे जे करावं लागेल ते चौकटीत राहून करण्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. या प्रकरणात गृहखात्याने संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची प्रतिक्रिया आली. लोकांनी शांतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. असं असतानाही त्यांना अटक करणे या गोष्टी योग्य नाहीत.  राज्य सरकारने याबाबत अधिक संवेदनशील व्हावं अशी अपेक्षा आहे," असं शरद पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

"बदलापूरचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूर