शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:41 IST

बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित  शाळेत दोन चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केले होते. हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. आता या घटनेवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. या आंदोलनातून केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

बदलापूरची घटना आणि राज्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी या बंदमधून लोकांनी महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त कराव्यात असं म्हटलं आहे.

"काल जे काही म्हणाले ते बदलापूरपर्यंत सीमित नव्हतं. त्याआधी तीन चार दिवसापूर्वीही काही ना काही घटना घडल्याचे दिसले. बालिकांवील, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच्याबद्दल लोकांमध्ये असलेला उद्रेक आणि राग हा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. हा बंद अत्यंत शांततेणे पाळण्यात यावा. माझ्या पक्षासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी व्हावं. याच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त करणे हा त्याचा हेतू आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आम्ही तिथे काय गेलो नव्हतो. पण माझ्या मते त्यावेळी कोण कुठल्या राजकीय पक्षाचे नव्हतं. असा प्रकार झाल्यानंतर त्याच्यावर ते राजकीय होतं अशी टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री असं बोलले नसतं तर योग्य झालं असतं. हा प्रश्न लोकांच्या संवेदना व्यक्त करण्याचा आहे. इथं कुणीही राजकारण आणलं नाही. आमच्या लोकांच्या मनातही नव्हत की अशाप्रकारे राजकीय काही करावं. केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. याच्याकडे त्या दृष्टीकोनातून बघू नये," असंही शरद पवार म्हणाले.  

"या घटना थांबताना नाही तर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटी समाजाला जागृत करावं लागेल. तसेच कायद्याच्या यंत्रणेलाही जागं करावं लागेल. मी कोणाला दोष देत नाही. पण हे न घडण्यासाठी जे जे करावं लागेल ते चौकटीत राहून करण्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. या प्रकरणात गृहखात्याने संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची प्रतिक्रिया आली. लोकांनी शांतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. असं असतानाही त्यांना अटक करणे या गोष्टी योग्य नाहीत.  राज्य सरकारने याबाबत अधिक संवेदनशील व्हावं अशी अपेक्षा आहे," असं शरद पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

"बदलापूरचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूर