शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:40 IST

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी संजय राऊतांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आपल्या भाषणांनी संजय राऊतांनी भाजपालाही जेरीस आणलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं संजय राऊतांची मुलाखत घेतली आहे.यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपाला जेव्हा शरद पवार स्वतःहून ऑफर देतात, तेव्हा ती महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी भाजपा किती उतावळी होती हेच यातून दिसून येतं. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत अगदी प्रधान मंत्र्यांपर्यंत यातून स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही एका बाजूला सांगत होता, आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही सरकार बनवणार नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावली, मग तुम्ही अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न केलात. आणि तेही जमलं नाही, तेव्हा तुम्ही शरद पवारांवर अशा प्रकारचं जाळं फेकत होतात, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणतात, तेसुद्धा यशस्वी झालं नाही. यातून एक स्पष्ट आहे, महाराष्ट्रातली सत्ता आम्ही शिवसेनेच्या हाती लागू द्यायची नाही, असाच त्यांचा उद्देश होता. अडीच अडीच वर्षं 50-50 नंतर पलटी मारली. शरद पवारसुद्धा चालतील, इतर कोणीसुद्धा चालतील. शिवसेना नको, हा एक संदेश यातून स्पष्ट झाला. शरद पवारांनी हा डाव उधळून लावला. ते काही त्यांच्या झाशामध्ये आले नाहीत. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा जर घ्यायचाच होता. तर पाच वर्षं का थांबले. याआधीसुद्धा शरद पवार विरोधी पक्षात होते, अनुभव त्यांचा तोच आहे. व्यक्ती तीच आहे. पण आता सरकार स्थापनेसाठी गरज लागते आहे म्हणून त्यांच्या अनुभवाचा केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांना फायदा घ्यायचा होता, हे जनतेला कळत नाही काय?, त्यावरती फार बोलणं आवश्यक नाही. सरकारच्या स्थिरतेबद्दल अजिबात शंका वाटत नाही. शरद पवार यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचं वागणं सहन करणार नाही. जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे आपण शिवतीर्थावरच्या शपथविधीदरम्यान पाहिल्या आहेत. ग्रामीण भागात जाऊन पाहा. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं जनतेला खूप आनंद झालेला आहे. विरोधासाठी विरोध हे शिवसेनेचं धोरण कधीही नव्हतं. एखादी गोष्ट राष्ट्रीय हिताची असल्यास शिवसेनेनं अनेकदा विरोधाची भूमिका सोडलेली आहे. सरकारमध्ये असतानाही ज्या भूमिका पटलेल्या नाहीत, त्यांना आम्ही विरोध केलेला आहे. राष्ट्र आणि राष्ट्राची जनता ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक राज्याची यासंदर्भातली भूमिका वेगळी आहे. आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे, पण त्यांची या प्रकरणातली भूमिका वेगळी आहे. निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. मला वाटत नाही अशा प्रकारची मागणी कोणी फार गांभीर्यानं केली असेल. संघटनांवर बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत आणि विचार मरत नाहीत. कोरेगाव-भीमाप्रकरणी जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेतील. सनातनवरील बंदीनं प्रश्न सुटणार नाहीत. विचार मरणार नाहीत.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019