शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कधीकाळी शरद पवारही सरसावले होते भाजपकडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 16:22 IST

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीमधून अनेक नेते वेगळे होत आहेत. या परिस्थितीत राष्ट्रवादीला निवडणुकीला सामोरे जायचे असून महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय आव्हानांना तोंड द्यायचे आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये पक्षांतराची जणूकाही स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षांतरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर आहे. सध्याच्या पक्षांतराच्या घडामोडींवरून २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची दाखवलेली तयारी याचे कारणं स्पष्ट होते. राष्ट्रवादी पक्ष रिकामा होऊ नये, यासाठीच पवारांनी भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्याही पारड्यात बहुमताचा आकडा टाकला नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याची गरज होती. परंतु, निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सूचित केले. किंबहुना भाजपने देखील सरकार स्थापनेचा दावा करत शपथविधीही उरकून घेतला होता. मात्र अखेरीस भाजपने विचारधारेचे कारण देत सेनेसोबत घरोबा करून सरकार चालवले.

२०१४ मध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा पवार यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी फारच क्लेशदायी ठरला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची शाश्वती असल्यामुळे भाजपने मंत्रीमंडळात कायमच शिवसेनेला दुय्यम स्थान दिले. तसेच सरकार वाचविण्यासाठी आदृश्य हात असल्याचे चित्र निर्माण केले. त्यामुळे शिवसेनेला अनेकदा नमते घ्यावे लागले. अनेकदा शिवसेनेकडून राजीनामास्त्र काढण्यात आले. परंतु, त्याचा भाजपवर परिणाम झाला नाही. परिणामी शिवसेनेने राज्यात सत्तेत सहभागी असूनही विरोधकांचीच भूमिका पार पाडली.

दरम्यान सत्तेला लाथ मारण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. परंतु, पक्षात फूट पडेल या भितीने पक्ष नेतृत्वाने सत्ता सोडणे सोयीचे होणार नसल्याचे ओळखले होते. परंतु, शिवसेनेला जी भीती होती, तिच भीती शरद पवार यांनाही होती का, असा सवाल राष्ट्रवादीतून सध्या सुरू असलेल्या पक्षांतरामुळे उपस्थित होत आहे. २०१४ पासून राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. तर आणखी १० नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यापैकी अनेक नेते विद्यमान आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीमधून अनेक नेते वेगळे होत आहेत. या परिस्थितीत राष्ट्रवादीला निवडणुकीला सामोरे जायचे असून महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय आव्हानांना तोंड द्यायचे आहे.