शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

"धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:39 IST

षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना आव्हान केले.

मुंबई - धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यात शरद पवार अजिबात तयार नव्हते. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन केला होता. मात्र काही पक्षांतर्गत शक्ती धनंजयला पक्षात प्रवेश द्यावा यासाठी प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धनंजय मुंडे यांना पक्षात घ्यायलाच शरद पवार तयार नव्हते. त्याला कशाकशातून वाचवलंय त्याचा विचार करावा असं एकदा मुलाखतीत शरद पवारच बोलले होते. शरद पवारांवर टीका करण्याची हिंमत तुम्ही दाखवली. शरद पवारांची अजिबात धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याची इच्छा नव्हती. शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला, घर फुटतंय गोपीनाथ राव सांभाळा. ४-५ वेळा धनंजय मुंडे शरद पवारांना भेटले. उद्या करू उद्या करू असं सांगितले. त्याशिवाय पक्षातील काही शक्ती त्यांना प्रवेश द्यावा यासाठीही प्रयत्नशील होत्या. मी त्यांचे नाव घेणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुडे यांचे विधान ढोंग आहे. त्यांच्या घरातून  गाड्या बाहेर पडल्या, त्यांच्या घरातून सगळ्यांना फोन गेले. साडे तीन वाजेपर्यंत ते कुठे होते. साडे तीन वाजता ते शरद पवारांना भेटायला वाय.बी चव्हाणला आले. षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? तेदेखील गद्दारीच्या षडयंत्रात सहभागी होते. हिंमत असेल तर कुणी तुम्हाला जाळ्यात अडकवले, कुणी फसवलं हे समोर येऊन सांगावे असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंना केलं. 

दरम्यान, वाल्मिक कराड गुन्हेगार आहे हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे हे त्यांनीच सांगितले. कराडला अटक केली तेव्हाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. हत्या ही सर्वात घाणेरडे काम आहे. कर्माची फळे मिळालीच पाहिजेत. कायद्याचा, अधिकाराचा, सत्तेचा गैरवापर करणे, बीडमध्ये गुन्हेगारी होते ती कोण करते, सामान्य माणसे करत नाहीत. राजकारणात एखाद्या माणसाचा वापर करून गुन्हेगार बनवणे फार सोपे असतात.  गोपीनाथ मुंडे असेपर्यंत धनंजय मुंडे यांना एका मर्यादेपर्यंत ठेवले होते. गरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुटले जातात. एवढा मोठा गुन्हा असून सरकारने नोंदवला नाही. एका माणसासाठी सरकारने किती सहन करायचे. परंतु यामुळे सरकार बदनाम होते ना असा टोलाही आव्हाडांनी लगावला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस