शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

"धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:39 IST

षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना आव्हान केले.

मुंबई - धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यात शरद पवार अजिबात तयार नव्हते. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन केला होता. मात्र काही पक्षांतर्गत शक्ती धनंजयला पक्षात प्रवेश द्यावा यासाठी प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धनंजय मुंडे यांना पक्षात घ्यायलाच शरद पवार तयार नव्हते. त्याला कशाकशातून वाचवलंय त्याचा विचार करावा असं एकदा मुलाखतीत शरद पवारच बोलले होते. शरद पवारांवर टीका करण्याची हिंमत तुम्ही दाखवली. शरद पवारांची अजिबात धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याची इच्छा नव्हती. शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला, घर फुटतंय गोपीनाथ राव सांभाळा. ४-५ वेळा धनंजय मुंडे शरद पवारांना भेटले. उद्या करू उद्या करू असं सांगितले. त्याशिवाय पक्षातील काही शक्ती त्यांना प्रवेश द्यावा यासाठीही प्रयत्नशील होत्या. मी त्यांचे नाव घेणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुडे यांचे विधान ढोंग आहे. त्यांच्या घरातून  गाड्या बाहेर पडल्या, त्यांच्या घरातून सगळ्यांना फोन गेले. साडे तीन वाजेपर्यंत ते कुठे होते. साडे तीन वाजता ते शरद पवारांना भेटायला वाय.बी चव्हाणला आले. षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? तेदेखील गद्दारीच्या षडयंत्रात सहभागी होते. हिंमत असेल तर कुणी तुम्हाला जाळ्यात अडकवले, कुणी फसवलं हे समोर येऊन सांगावे असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंना केलं. 

दरम्यान, वाल्मिक कराड गुन्हेगार आहे हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे हे त्यांनीच सांगितले. कराडला अटक केली तेव्हाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. हत्या ही सर्वात घाणेरडे काम आहे. कर्माची फळे मिळालीच पाहिजेत. कायद्याचा, अधिकाराचा, सत्तेचा गैरवापर करणे, बीडमध्ये गुन्हेगारी होते ती कोण करते, सामान्य माणसे करत नाहीत. राजकारणात एखाद्या माणसाचा वापर करून गुन्हेगार बनवणे फार सोपे असतात.  गोपीनाथ मुंडे असेपर्यंत धनंजय मुंडे यांना एका मर्यादेपर्यंत ठेवले होते. गरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुटले जातात. एवढा मोठा गुन्हा असून सरकारने नोंदवला नाही. एका माणसासाठी सरकारने किती सहन करायचे. परंतु यामुळे सरकार बदनाम होते ना असा टोलाही आव्हाडांनी लगावला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस