शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

"धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:39 IST

षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना आव्हान केले.

मुंबई - धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यात शरद पवार अजिबात तयार नव्हते. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन केला होता. मात्र काही पक्षांतर्गत शक्ती धनंजयला पक्षात प्रवेश द्यावा यासाठी प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धनंजय मुंडे यांना पक्षात घ्यायलाच शरद पवार तयार नव्हते. त्याला कशाकशातून वाचवलंय त्याचा विचार करावा असं एकदा मुलाखतीत शरद पवारच बोलले होते. शरद पवारांवर टीका करण्याची हिंमत तुम्ही दाखवली. शरद पवारांची अजिबात धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याची इच्छा नव्हती. शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला, घर फुटतंय गोपीनाथ राव सांभाळा. ४-५ वेळा धनंजय मुंडे शरद पवारांना भेटले. उद्या करू उद्या करू असं सांगितले. त्याशिवाय पक्षातील काही शक्ती त्यांना प्रवेश द्यावा यासाठीही प्रयत्नशील होत्या. मी त्यांचे नाव घेणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुडे यांचे विधान ढोंग आहे. त्यांच्या घरातून  गाड्या बाहेर पडल्या, त्यांच्या घरातून सगळ्यांना फोन गेले. साडे तीन वाजेपर्यंत ते कुठे होते. साडे तीन वाजता ते शरद पवारांना भेटायला वाय.बी चव्हाणला आले. षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? तेदेखील गद्दारीच्या षडयंत्रात सहभागी होते. हिंमत असेल तर कुणी तुम्हाला जाळ्यात अडकवले, कुणी फसवलं हे समोर येऊन सांगावे असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंना केलं. 

दरम्यान, वाल्मिक कराड गुन्हेगार आहे हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे हे त्यांनीच सांगितले. कराडला अटक केली तेव्हाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. हत्या ही सर्वात घाणेरडे काम आहे. कर्माची फळे मिळालीच पाहिजेत. कायद्याचा, अधिकाराचा, सत्तेचा गैरवापर करणे, बीडमध्ये गुन्हेगारी होते ती कोण करते, सामान्य माणसे करत नाहीत. राजकारणात एखाद्या माणसाचा वापर करून गुन्हेगार बनवणे फार सोपे असतात.  गोपीनाथ मुंडे असेपर्यंत धनंजय मुंडे यांना एका मर्यादेपर्यंत ठेवले होते. गरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुटले जातात. एवढा मोठा गुन्हा असून सरकारने नोंदवला नाही. एका माणसासाठी सरकारने किती सहन करायचे. परंतु यामुळे सरकार बदनाम होते ना असा टोलाही आव्हाडांनी लगावला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस