शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:43 AM

शरद पवार हेच ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रगुप्त’ही तेच आहेत, अशी टिपणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केली

पिंपरी : लहानपणी शरद पवार हे माझे हिरो होते, त्यांचे वय २५ तर माझे १५. महाराष्ट्रासाठी ही व्यक्ती काहीतरी करेल, असे मला वाटायचे. पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत, असे मला सुरुवातीला  वाटायचे. काही काळानंतर असे वाटायला लागले की, या माणसाने एकही ‘चंद्रगुप्त’ केला नाही हे दुर्दैव. परंतु काही काळानंतर समजले की, शरद पवार हेच ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रगुप्त’ही तेच आहेत, अशी टिपणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत समीरण वाळवेकर यांनी घेतली. या वेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सदाशिव खाडे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, संयोजक अमित गोरखे, अनुराधा गोरखे, मधुकर बाबर आदी उपस्थित होते.‘‘अंधारात सुख शोधायचे असते. आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकायलाच हवे असे काही नाही. पटावर फक्त पाठ टेकवायची नसते, या नानांच्या पहिल्याच वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. पाटेकर म्हणाले, ‘‘जगण्यातील आगीत होरपळल्यानंतर दैन्य सांगून सहानुभूती मिळविणे मला आवडत नाही. ही माणसाने पायरी म्हणूनही वापरू नये. माणसाने सकारात्मक पद्धतीने जीवन जगायला हवे. हे मला परिस्थितीने शिकविले. मी नेहमी मते ठाम ठेवली.’’खलनायक भूमिकांविषयी नाना म्हणाले, ‘‘प्रत्येक भूमिकेतून घुसमट व्यक्त होत असते. खलनायकांच्या अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्या मानसिकतेत जायला मला आवडत नाही. लहानपणी वडिलांबरोबर तमाशा पाहायला जात असेहनुमान थिएटरमध्ये दादू इंदोरीकर, वसंत अवसरीकर यांचे गाढवाचं लग्न पाहिले आहे.’’    ‘गाढवाचं लग्न’मध्ये काय सोंगाडे काम करायचे. त्यातील एक सोंगाड्या म्हणजेच वसंतराव. या कलावंतापासून मला अभिनय शिकायला मिळाला. अभिनय हा शरीरातच भिनायला हवा. हे कोणत्याही विद्यापीठात शिकायला मिळत नाही. जीवनात ‘अपमान’ आणि ‘भूक’ हे दुसरे गुरू ठरले. अचानक एखाद्या गोष्टीवर मी भावूक होतो आणि डोळ्यांत पाणी तरळते. त्यावेळी मी विचार करतो, असे का झाले, तर त्यांचे उत्तर असते. त्यावेळी जे राहून गेले आहे, ते आता रडून घेत आहे, असेही नाना म्हणाले.हास्याचा खळखळाट आणि विदीर्ण घटनांनी अंतर्मुखचिंचवडमधील बांधकाम प्रकल्पांवर मुकादम म्हणून केलेले काम येथपासून तर चित्रपट, नाट्य सृष्टीतील यशशिखरापर्यंतची वाटचाल, शेतकरी आत्महत्येपासून नाम फाउंडेशन आणि राजकारणापर्यंत व्यक्त केलेली सडेतोड मते, नानांचा जीवनपट मुलाखतीतून उलगडला. कलावंत आणि माणूसपण जपणा-या नानांचे जीवनदर्शन घडले. खमासदार किस्यांतून हसविण्याबरोबरच, मन विदीर्ण करणाºया काही घटनांच्या आठवणींनी रसिकांचे डोळे पाणावले. सामाजिक भान आणि नवी उमेद देत नानांनी रसिकांना अंतर्मुख करायला लावले.

अंमलबजावणी आणि पायमल्लीराजकारणावर नाना म्हणाले, ‘‘सर्व पक्षांत सर्व सुंदर आहे. सर्वांमध्ये वागायचे कसे अशी आचारसंहिता असते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. पायमल्लीच अधिक होते. सर्वच पक्षांत माझे मित्र आणि स्नेही आहेत. मी राजकारणात गेलो नाही, कारण म्हणजे, मला सडेतोड बोलायची सवय आहे. मी जर कोणाला चूक म्हटलो तर लगेच मला पक्षातून काढून टाकतील आणि मला दुसºया पक्षात जावे लागेल. तेथेही पुन्हा तेच झाले तर पक्षच शिल्लक राहणार नाही. म्हणून राजकारणात गेलो नाही.’’मॉलमध्ये भाव करता का?‘शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी’ या विषयावर नाना म्हणाले, ‘‘आत्महत्या करण्याच्या क्षणी माणसाने क्षणभर विचार करायला हवा. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाला थांबला तर जीवन सावरू शकेल. शेतमालाचे दर वाढले तर तुमचे वेळापत्रक बिघडते. मॉलमध्ये भाव करता का? मात्र, शेतकºयांच्या मालाला भाव नसल्याने त्याचे वेळापत्रक बिघडलंय त्याचे काय? कर्जमाफीबरोबरच शेतीचे शास्त्र बळीराजाला समजून सांगितले पाहिजे. विकणार पीक घ्यायला हवे. सतत बदल करायला हवा.’’  अशोक सराफ माझ्यासाठी हरायचापाटेकर म्हणाले, ‘‘हमीदाबाईची कोठी नाटकाच्या वेळी मला ५० रुपये नाईट मिळायची, तर अशोक सराफ यांना तीनशे. त्यावेळी दीडशे रुपयात महिन्याचे राशन मिळायचे. तीन-चार प्रयोग केले की, महिन्याचा खाण्याचा प्रश्न मिटायचा. त्यावेळी अशोक मला मदत करायचा. आम्ही रमी खेळायचो. त्यात तो हरायचा आणि १५ रुपये मला मिळायचे. त्याचे अंग चेपून दिले की पाच रुपये द्यायचा. हे सगळंतो माझ्या परिस्थितीसाठीच करायचा हे मला कळायचं. आता जरी तो मला भेटला तर मी त्याचे अंग चेपून देतो. आणि तो मला पाच रुपये देतो. वरून म्हणतो, महागाई वाढलीय.’’ यावर जोरदार हास्याची लाट उसळली.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण