शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार भानगडीत सापडत नाही, शिवचरित्र वाचल्याचा परिणाम दिसतोय- नामदेवराव जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 4:23 PM

शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेले पैसे लोहगडावर ठेवले होते, राजगडावर नाही. पैसे कधीच घरात ठेवायचे नसतात. ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असतात.

ठाणे : शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेले पैसे लोहगडावर ठेवले होते, राजगडावर नाही. पैसे कधीच घरात ठेवायचे नसतात. ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असतात. परंतु नाशिकच्या एका माणसाला ते कळले नाही. पैसे जमा करता करता स्वत: आतमध्ये जमा आहेत. मात्र शरद पवार कोणाच्या भानगडीत सापडल्याचे कधी ऐकले नाही. शिवचरित्र वाचल्याचा परिणाम दिसतोय. आरोप चिक्कार झाले तरी काय यंत्रणा हलवतात माहीत नाही पण ते सहीसलामत सुटतात, अशा शब्दांत नामदेवराव जाधव यांनी कोपरखळी मारली.रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बुधवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात पार पडले. यावेळी नामदेव जाधव यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. शिवरायांच्या काळात तेव्हा शिंदे, होळकर अशी मराठी माणसे ठरवत होते की, दिल्लीचा बादशहा कोण असेल आणि गेल्या अनेक वर्षांत आपण एकही पंतप्रधान देशाला देऊ शकलो नाही. मराठी माणूस पंतप्रधान का झाला नाही, असे अनेक जण विचारतात. कारण एकही मराठी राजकारणी किल्ल्यांकडे फिरकत नाही. जोपर्यंत मराठी माणूस किल्ल्यांकडे जात नाही तोपर्यंत पंतप्रधान होऊ शकत नाही. सुमारे 40 खासदार असलेले देवेगौडा पंतप्रधान झाले आणि 48 खासदार असलेला महाराष्ट्र पंतप्रधानपदाचा उमेदवार देऊ शकत नाही. कारण आपण शिवरायांच्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले आहे, अशा शब्दात जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.शिवरायांचे मॅनेजमेंट वयाच्या 12व्या वर्षांपासून सुरू झाले होते. महाराजांनी आपल्या आयुष्यातील 18316 पैकी 16242 दिवस निवांत बसून काढले आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्त्वाचा वापर त्यांनी केला. मात्र त्यांचे मॅनेजमेंट मराठी माणसांना कळले नाही. ते गुजराती, सिंधींना कळले. त्यांनी महाराजांचे ऐकून उद्योग, व्यवसाय सुरू केले. महाराजांनी छापा टाकायला शिकवले. मात्र मराठी माणसं आज नोकरीच्या मागे धापा टाकतात. केवळ दुकानाच्या पाट्या मराठी करून चालणार नाही. त्यातील दुकानदार मराठी असला पाहिजे. यूपी, बिहारच्या फेरीवाल्यांना, वडापाववाल्यांना मारण्यापेक्षा त्यांच्या बाजूला आपण एखादी गाडी टाकून व्यवसाय सुरू केला पाहिजे, अशा शब्दात जाधव यांनी मराठी माणूस आणि त्याच्या सध्या परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले.मराठी माणसांनीच, काही कीर्तनकारांनी काही कादंबरीकारांनी त्यांची बदनामी केली. विश्व वंदिता असलेल्या शिवरायांना आपण केवळ महाराष्ट्राचे आराध्यदैवत केले. हत्ती एवढ्या माणसाची आपण मुंगी एवढं करून ठेवलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद वडके तसेच आमदार संजय केळकर उपस्थित होते.सैराटनंतर मुलं पालकांविरोधात बंड करायला तयार शिवरायांचे प्रत्येक शिलेदार हे तत्पर होते. गाफिल नव्हते. मात्र आजची मुलं ही गाफील आहेत , काबील नाही. मुलांच्या हातातील मोबाईलवरील व्हॉटस्अप, फेसबुकला आळा घाला. नाही तर मुलं त्याच व्हॉटसअॅपवरून तुम्हाला त्यांच्या लगAाची निमंत्रणो पाठवतील. अशी अनेक प्रकरणो घडत आहेत.सैराट चित्रपट आल्यापासून मुलं तर आईवडिलांच्या विरोधात अगदी बंडच करायला तयार झालीत.मात्र ते कृत्रिम, काल्पनिक आहे. रिल लाईफ अॅण्ड रिअल लाईफमध्ये फरक आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :thaneठाणेSharad Pawarशरद पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज