शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:32 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आपला रोष व्यक्त केला आहे.

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत महायुती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरही दावा सांगितला असून पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या गटाला मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसंच दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेतेही एकमेकांसमोर उभ ठाकत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, "अजित पवारांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी त्यांनीच १९ ते २० आमदारांच्या सह्या घेतल्या आणि ते पत्र शरद पवारांना देण्यात आलं होतं. मात्र यात माझी सही नव्हती. कारण मला विरोधी पक्षनेते करा, यासाठी मीच पवारांना एक कॉन्फेडेन्शियल पत्र लिहिलं होतं. अजित पवारांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर नेहमीच सर्व पदे अजित पवारांना दिली गेली किंवा त्यांच्या मान्यतेने दुसऱ्यांना दिली गेली. शरद पवारांची सर्वांत मोठी चूक हीच आहे. जे करायचं ते अजितने करायचं, उपमुख्यमंत्री अजित पवारच, दुसरं कोणतं महत्त्वाचं पद असेल तरीही अजित पवार आणि पक्षात हे सगळ्यांना माहीत होतं. पण कोणी बोलत नाही आणि मी बोलतो, एवढाच फरक आहे."

"अजित पवारांना स्वत:शिवाय दुसरं कोणी नको होतं"

"विरोधी पक्षनेतेपदासाठी मी शरद पवारांना पत्र लिहिलं, पण ते मला मिळणारच नव्हतं. कारण मोठ्या पदांसाठी तिथं केवळ नऊ जणच हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी वर आलीच नसती. नवी पिढी आली पाहिजे की नाही? शरद पवारांनंतर तुम्हाला उचललं गेलं ना? पण तुम्ही तुमच्यानंतर कोणाला वर आणलं का? मी...मी आणि फक्त मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती," असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

"२०१९ ला राज्यपालांना जे पत्र दिलं गेलं, ते क्लार्कने अजित पवारांना दिलं होतं"

राष्ट्रवादीत यंदा घडलेलं बंड हे काही पहिलंच नाही. यापूर्वी २०१९ ला देखील अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध डावलून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गर्जे नावाच्या क्लार्कने अजित पवारांना दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच ते पत्र घेऊन अजित पवार राज्यपालांकडे गेले, मात्र नंतर ४० आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले, असंही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार