शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:32 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आपला रोष व्यक्त केला आहे.

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत महायुती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरही दावा सांगितला असून पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या गटाला मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसंच दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेतेही एकमेकांसमोर उभ ठाकत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, "अजित पवारांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी त्यांनीच १९ ते २० आमदारांच्या सह्या घेतल्या आणि ते पत्र शरद पवारांना देण्यात आलं होतं. मात्र यात माझी सही नव्हती. कारण मला विरोधी पक्षनेते करा, यासाठी मीच पवारांना एक कॉन्फेडेन्शियल पत्र लिहिलं होतं. अजित पवारांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर नेहमीच सर्व पदे अजित पवारांना दिली गेली किंवा त्यांच्या मान्यतेने दुसऱ्यांना दिली गेली. शरद पवारांची सर्वांत मोठी चूक हीच आहे. जे करायचं ते अजितने करायचं, उपमुख्यमंत्री अजित पवारच, दुसरं कोणतं महत्त्वाचं पद असेल तरीही अजित पवार आणि पक्षात हे सगळ्यांना माहीत होतं. पण कोणी बोलत नाही आणि मी बोलतो, एवढाच फरक आहे."

"अजित पवारांना स्वत:शिवाय दुसरं कोणी नको होतं"

"विरोधी पक्षनेतेपदासाठी मी शरद पवारांना पत्र लिहिलं, पण ते मला मिळणारच नव्हतं. कारण मोठ्या पदांसाठी तिथं केवळ नऊ जणच हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी वर आलीच नसती. नवी पिढी आली पाहिजे की नाही? शरद पवारांनंतर तुम्हाला उचललं गेलं ना? पण तुम्ही तुमच्यानंतर कोणाला वर आणलं का? मी...मी आणि फक्त मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती," असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

"२०१९ ला राज्यपालांना जे पत्र दिलं गेलं, ते क्लार्कने अजित पवारांना दिलं होतं"

राष्ट्रवादीत यंदा घडलेलं बंड हे काही पहिलंच नाही. यापूर्वी २०१९ ला देखील अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध डावलून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गर्जे नावाच्या क्लार्कने अजित पवारांना दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच ते पत्र घेऊन अजित पवार राज्यपालांकडे गेले, मात्र नंतर ४० आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले, असंही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार