शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

शेतकरी आत्महत्येची जबाबदारी शरद पवारांवरही; रघुनाथदादांचा आरोप

By appasaheb.patil | Updated: January 9, 2020 15:09 IST

नेहरूंची शेतकरी विरोधी भूमिकाच मोदी पुढे नेत असल्याचाही केला आरोप

ठळक मुद्दे- शेतकरी नेते रघुनाथ पाटील सोलापूर दौºयावर- औरंगाबाद येथे होणाºया कार्यक्रमाची दिली माहिती- शेतकरी आत्महत्या थांबविण्यात सरकार अपयशी असल्याचा आरोप 

सोलापूर : सरकार बदलले मात्र धोरण बदलले नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ शेती उद्योगातील क्रांतीचे श्रेय घेणाºया शरद पवारांनी शेतकºयांच्या आत्महत्यांचीही जबाबदारीही स्वीकारावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. 

१५ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे कै़ बबनराव काळे याच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेची कार्यकारणी व्यापक स्वरूपाची करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे़ या मेळाव्याची माहिती सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सोलापुरात आले होते़ त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पुढे बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले की, सरकार तेच आहे मात्र नाव बदलले आहे़ राज्य सरकारमधील नाव बदलली आहेत. बाकीचे सर्वकाही तसेच आहे. शेतकरी बदलली जात आहेत, धोरणे मात्र तीच कायम आहेत. पंडीत नेहरूंनी जी शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तोच वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे चालवित आहेत.

शरद पवार जाणते राजे आहेत. पन्नास वर्षे राजकारणात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरूवातीची पंधरा वीस वर्षे शेतकºयांच्या आत्महत्या नव्हत्या. गेल्या ४० वर्षात पवार राजकारणात  आले, तसे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रकार वाढले. विकासकामांचा मोठेपणा ते जसे घेतायेत, आम्ही मोठेपणा द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे पाप हे त्यांचेच आहे, असेही पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील पाण्याचे योग्य नियोजन झाले तर महाराष्ट्रासह जवळच्या राजातील पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत.शेतकरी विरोधी कायदा केंद्र सरकारने बदलला पाहिजे. शेतकरी सुखी तर देश सुखी हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. मोदी सरकारने समस्या सोडविण्याऐवजी वाढविल्या आहेत. शेतकरी संकटात असताना आपला देश महासत्ता कसा होणार. केवळ निवडून आलेले लोक ठरवतील तेच धोरण हे शेतकरी संघटनेस अमान्य असल्याचेही पाटील यांनी सांगितले़  

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याSharad Pawarशरद पवारSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना